कोरोनाबाधितांचा वाढता आकडा लक्षात घेता राज्य सरकारने संपूर्ण महाराष्ट्रात वीकेंड लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या घोषणेअंतर्गत 30 एप्रिलपर्यंत प्रत्येक आठवड्याच्या शनिवार-रविवारी लॉकडाऊन लागू असेल. काल शुक्रवारी दिवसभरात संपूर्ण महाराष्ट्रात 58,993 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.
या वीकेंड लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मुंबई पुन्हा एकदा शांत झाल्याचं चित्र आहे. तर एकट्या मुंबईमध्ये शुक्रवारी 9200 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.
नेहमी वरदळ आणि गर्दी असलेल्या ठिकाणी शुकशुकाट पाहायला मिळतोय. शुक्रवारी मुंबईत एकूण 35 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
लॉकडाऊन प्रातिनिधीक फोटो
ब्रेक दि चेनच्या आदेशात म्हटल्याप्रमाणे आवश्यक सेवा सुरु राहतील. कोणताही व्यक्ती योग्य कारणांशिवाय फिरू शकणार नाही. ही कारणे आदेशात नमूद आहेत.
राज्यात सोमवारी सकाळी 7 पर्यंत कडकडीत बंद असणार आहे.
एकूणच वीकेंड लॉकडाऊनला मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद बघायला मिळतोय.