डीपीडीसी बैठकीमध्ये कोण किती वेळ बोललं आणि अजित पवार यांनी किती ऐकलं याचं रेकॉर्ड आहे. पण उगाच सहानुभूती घेण्यासाठी काहीजण म्हणतात की मी साहेबांना बोलू दिलं नाही…. अरे मी कसा बोलू देणार नाही, असं अजित पवार यांनी म्हटलं. त्यांनी सुप्रिया सुळे यांना टोला लगावला आहे. अजित दादाचा वादा आहे. वाद्याचा पक्का आहे. पण हे सगळ हवं असेल. या योजना हव्या असतील तर परत महायुतीला निवडून द्या, काम कस करून घ्यायचे मी बघतो, असंही अजित पवार म्हणाले.
दूध, गॅस, लाडकी बहिण इतर सर्व योजना आहेत. यावर आता 75 हजार कोटी सरकार योजनेवर खर्च करतंय. अजित दादाचा वादा आहे. वाद्याचा पक्का आहे. पण हे सगळं हवं असेल. या योजना हव्या असतील तर परत महायुतीला निवडून द्या. काम कसं करून घ्यायचे मी बघतो, असा शब्द अजित पवार यांनी दिलाय.
केंद्रात एन डी ए सरकार आहे तसे राज्यात आलं. तर आम्ही काही चर्चा मोदी शाह यांच्याशी केला आहे. केंद्राशी काही योजना बाबत चर्चा झाली आहे. योजना करताना करोडो रुपये लागतात. रिंग रोड,मेट्रो काम अजून करायची आहेत. पुणेकरांनो थोडा त्रास होत आहे. काही काम सुरू आहेत. त्याचा पण कामाला गती देत आहे. आपण वाहतूक कोंडी त्रास होत आहे. पण थोडा दिवस कळ काढा मी कसं करतो बघा. मूलभूत गरजा पूर्ण करू. मी राज्यातील 5 दिवस राज्यात आणि 2 दिवस मुबईमध्ये असेल, आता झोकून देऊन काम करावं लागणार आहे. अल्पसंख्याक लोकाचं मत परिवर्तन करा, असा आदेशही अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिलाय.
पुण्याला बदनामी करणाऱ्या घटना मधल्या काळात घडल्या त्या सर्वा कारवाई केली आहे. अतिक्रमण करून धंदे करणार असेल तर चालणार नाही. गैर प्रकार झाला. नियमावलीत भेदभाव नाही. पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणात पुण्याचे वडगाव शेरी आमदार सुनील टिंगरे यांची तीन चार चौकशी झाली. पण त्यातून काही समोर आले नाही. त्यामुळे उगाच बदनामी केली जातंय, असं अजित पवारांनी म्हटलं.