राज ठाकरेंनी फुंकलं निवडणुकीचं रणशिंग, मतदारसंघाचा सर्व्हे करणार; दोन दिवसात टीम तुमच्या जिल्ह्यात

| Updated on: Jul 25, 2024 | 1:46 PM

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदारसंघाचा सर्व्हे केला जाणार आहे, अशा सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या. त्यासोबत राज ठाकरेंनी युतीसह जागा वाटपाबद्दलही सांगितले.

राज ठाकरेंनी फुंकलं निवडणुकीचं रणशिंग, मतदारसंघाचा सर्व्हे करणार; दोन दिवसात टीम तुमच्या जिल्ह्यात
Follow us on

Raj Thackeray Vidhansabha Election 2024 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पदाधिकारी मेळावा मुंबईत पार पडला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीबद्दल भाष्य केले. राज ठाकरेंनी पदाधिकारी मेळाव्यात बोलताना आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदारसंघाचा सर्व्हे केला जाणार आहे, अशा सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या. त्यासोबत राज ठाकरेंनी युतीसह जागा वाटपाबद्दलही सांगितले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज वांद्र्यातील रंगशारदा सभागृहात एक मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी राज ठाकरेंनी केलेल्या भाषणात येत्या दोन दिवसात तुमच्या जिल्ह्यात टीम येईल. ती टीम मतदारसंघाचा सर्व्हे करेल. त्यांना जी परिस्थिती आहे, त्याबद्दल खरं खरं सांगा, असे आदेश दिले.

“प्रामाणिकपणे माहिती द्या”, राज ठाकरेंचे आदेश

आजच्या बैठकीला बोलावण्याचं कारण म्हणजे पक्षातील एक चार पाच जणांची टीम केली आहे. तुम्हाला माहीत नसेल, ते तुमच्या तालुक्यात येऊन गेले. सर्व्हे झाला. ते पत्रकारांशी बोलले. त्यानंतर आता परत ते चार पाच दिवसात तुमच्याकडे येतील. तुम्हाला भेटतील. तुमच्या मतदारसंघात काय परिस्थिती आहे, ते त्यांना सांगा. काय गोष्टींचं गणित घडू शकते, काय करता येऊ शकतं, याचा विचार करा.

तुम्ही जे बोलाल, सांगाल, जी कोणतीही माहिती द्याल, ती माहिती नीट द्या. प्रामाणिकपणे द्या. तुम्ही दिलेली माहितीही चेक केली जाणार आहे. तुमच्यापर्यंत ही लोकं येतील. मग युती होईल का? जागा मिळतील का? असा निर्णय मनात आणून नका. जवळपास सव्वा दोनशे ते २५० जागा लढवणार आहोत. सर्व गोष्टी चेक करणार आहोत.

निवडणुकीच्या कामाला लागा

त्यामुळे टीम येईल, तुम्हाला फोन करेल. बोलतील. त्यानंतर माझ्याकडे सर्व्हे येईल. ही माहिती देण्यासाठी मी तुम्हाला बोलावलं आहे. जे जिल्हाध्यक्ष शहरअध्यक्ष जे कोणी आले नसतील त्यांना टीम फोन करेल आणि कधी येणार हे सांगतील. एक दोन दिवसातच येतील. त्यानंतर तुम्ही निवडणुकीच्या कामाला लागा, असे आदेश राज ठाकरेंनी यावेळी दिले.