“लाडके आमदार, नावडते आमदार यापेक्षा…”, लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात

| Updated on: Dec 17, 2024 | 3:22 PM

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीका केली. "आवडती नावडती बहीण न करता ते पैसे सरसकट खात्यात जमा व्हायला पाहिजेत", असे उद्धव ठाकरे म्हणाले.

लाडके आमदार, नावडते आमदार यापेक्षा..., लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात
Follow us on

Uddhav Thackeray On Ladki bahin Yojana : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना ही गेमचेंजर ठरली. यंदाच्या निवडणुकीत महायुती सरकारला लाडकी बहीण योजनेमुळे मोठे यश मिळाले. आता विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर अद्याप लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा झालेले नाहीत. त्यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीका केली. आवडती नावडती बहीण न करता ते पैसे सरसकट खात्यात जमा व्हायला पाहिजेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी लाडकी बहीण योजनेवरुन सरकारवर निशाणा साधला. “सध्या लाडक्या बहिणीपेक्षा लाडके आमदार ज्यांना मंत्रिपद मिळाली आणि नावडते आमदार अशीच चर्चा जास्त रंगली आहे”, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी टीका केली.

आवडती नावडती बहीण न करता पैसे सरसकट जमा व्हायला पाहिजेत

“सध्या लाडक्या बहिणीपेक्षा लाडके आमदार ज्यांना मंत्रिपद मिळाली आणि नावडते आमदार अशीच चर्चा जास्त रंगली आहे. लाडक्या बहिणीचे पहिल्या पाच महिन्याचे ७५०० जमा झाले. निवडणूक आयोगाच्या माध्यमातून स्थिगिती मिळाली. निवडणूक झाली, आचारसंहिता संपली. निवडणुकीच्या आधी ज्याप्रकारे तात्काळ पैसे दिले गेले. त्याप्रमाणे आता ही योजना तात्काळ सुरु केली पाहिजे आणि १५०० नव्हे तर महायुतीने २१०० प्रमाणे पैसे द्यायला हवेत. त्यात परत आवडती नावडती बहीण न करता ते पैसे सरसकट खात्यात जमा व्हायला पाहिजेत”, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली.

आवडती नावडती बहीण करु शकत नाही

एका घरात एकाच महिलेला मिळणार आहे. अमूक बघणार, तमूक बघणार असे सुरु आहेत. त्यामुळे त्यांचे जे काही डाव होते. ते आता उघडे झालेत. त्यामुळे आता तुम्ही बहि‍णींमध्ये आवडती नावडती बहीण करु शकत नाही. करता कामा नये. जसं गेल्यावेळी तुम्ही निकष न लावता लाडक्या बहिणीच्या योजनेतंर्गत पैसे दिले, ते पैसे आता हे निकष बाजूला ठेवून २१०० रुपये तात्काळ माझ्या बहि‍णींच्या खात्यात जमा व्हायला पाहिजेत, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.