Maharashtra News Live : आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. यामुळेच सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत महाविकासआघाडी विरुद्ध महायुती असा संघर्ष रंगणार आहे. त्यामुळे सध्या जागावाटप, मतदारसंघ यावर चर्चा सुरु आहेत. तर दुसरीकडे राज्यात गणेशोत्सवाची धामधूम पाहायला मिळत आहे. उद्या अनंत चतुर्दशी असल्याने आज मुंबईसह ठिकठिकाणच्या मंडळात भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. तसेच मोदी 3.0 सरकारचा 100 दिवसांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. सध्या मुंबईची लाईफलाईन विस्कळीत झाली आहे. त्यामुळे अनेक चाकरमान्यांचा लेटमार्क लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या वाचण्यासाठी आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
मंत्रिपदाचा प्रतीक्षेत असलेल्या संजय शिरसाठ यांची महामंडळावर वर्णी. शहर व औद्योगिक विकास महामंडळाच्या अर्थात सिडकोच्या अध्यक्षपदी निवड
काल बैठक झाली मुख्यमंत्र्यांनी चर्चा करून रोड मॅप बनवला आहे. मी दुसऱ्या बैठकीत असल्याने त्या बैठकीला नव्हतो. मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्या दिशेने आपण पुढे चाललो आहोत. असं देवेंद्र फडणवीस यांनी धनगर आरक्षणावर बोलताना म्हटले आहे.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राला तीन वंदे भारत ट्रेनची भेट दिली आहे. महाराष्ट्रातील प्रवाशांना याचा सुखकर प्रवासासाठी फायदा होणार आहे. वंदे भारत ट्रेन भारताची शान आहे. असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
आम आदमी पार्टीने आज संध्याकाळी 5.30 वाजता पीएसीची बैठक बोलावली आहे. ही बैठक मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी होणार आहे. पीएसीच्या बैठकीत दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर चर्चा होणार आहे. केजरीवाल यांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर पीएसीची ही पहिलीच बैठक आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा डॉक्टरांची बैठक बोलावली आहे. सायंकाळी 5 वाजता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे. आंदोलक डॉक्टरांशी बोलण्याची ही शेवटची संधी असल्याचे ममता म्हणाल्या. सभेचे कोणतेही लाईव्ह स्ट्रीमिंग होणार नाही. अशा स्थितीत आंदोलक डॉक्टर या बैठकीला हजर राहतात की नाही हे पाहावे लागेल.
उत्तर प्रदेश विधानसभा पोटनिवडणुकीत समाजवादी पक्षासोबत युती करण्याच्या बातमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय राय म्हणाले की, आम्ही एकत्र लढू. आम्ही केंद्रीय नेतृत्वाला 5 जागांचा प्रस्ताव दिला आहे. केंद्रीय नेतृत्व निर्णय घेईल. आम्ही एकत्र लढू आणि 10 पैकी 10 जागांवर भाजपचा पराभव करू.
जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड येथे एका सभेला संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस म्हणतात की त्यांचे सरकार स्थापन झाल्यास ते कलम 370 पुन्हा लागू करतील. कलम 370 परत करावे का? कलम 370 आता इतिहासाचा भाग बनले आहे. भारतीय राज्यघटनेत कलम 370 ला स्थान नाही. काश्मीरमध्ये दोन पंतप्रधान, दोन संविधान आणि दोन ध्वज कधीच असू शकत नाहीत. एकच ध्वज असेल आणि तो म्हणजे आपला तिरंगा.
सुरक्षारक्षक प्रसाद कदम ने केली सुपरवायझर सोमनाथ सादगीर याची हत्या. लोढा हमारा मधील सिग्नेट इमारतीच्या टेरेसवर आढळला धडापासून शिर कापलेला मृतदेह. रात्री दहाच्या सुमाराची घटना
वाळू व्यवसायिकावर झाला गोळीबार. गोळीबाराच कारण अद्याप अस्पष्ट दोन दिवसात गोळीबाराच्या दोन घटना पुण्यात. कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न ऐरणीवर
फेक नेरेटिव्हचे बादशाह देवेंद्र फडवणीस आहे फेक नेरेटिव्हचे करून जीव घेण्याची भाषा जर कोणी करत अडानी करत असेल तर जनता त्याला माफ नाही करता येणार त्यावर कारवाई झाली पाहिजे, संजय गायकवाड यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी -यशोमती ठाकूर यांची मागणी
भाजपचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे यांनी भाजपच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. भाजपचे जेष्ठ नेते तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे हे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा होती..
दिवा ते मुंब्रा रेल्वे स्थानक डाऊन मार्गावरमध्ये तांत्रीक बिघाड झाल्यामुळे दोन्ही बाजूच्या जलद लोकल वाहतूक मंदावली. प्लँटफॉर्म 5 व 6 वरील जलद गाड्यांची वाहतूक मंदावली आहे.
पंढरपुरात स्वराज्य संग्राम संघटनेचे पहिले अधिवेशन मोठ्या उत्साहात पार पडले. राज्याच्या विविध भागातून स्वराज्य संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये जमा झाले होते. दुपारी पंढरपूर शहरातून रॅली काढून अधिवेशनाला सुरुवात करण्यात आली. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तानाजी शिंदे, यांनी मराठा समाजाला आरक्षण समान नागरी कायदा शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी हे मुद्दे घेऊन अधिवेशनात ठराव संमत केले.
अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात येणारी भाज्यांची आवक मंदावली आहे. यामुळे भाज्याचे दर वाढले आहे. कांदा आणि कोथिंबीर 50 शी पार गेले आहे. रत्नागिरीत कोथिंबीर जुडी 70 रुपयांवर विकली जात आहे. कांद्याचे दर देखील 60 ते 70 रुपये किलो आहे.
महाराष्ट्रचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील घरी भेट देत गडकरी यांची भेट घेतली. ते सध्या नागपूर दौऱ्यावर आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने गोळा केलेला अहवाल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा प्राथमिक अहवाल दोन दिवसात सादर होणार आहे. गुरुवारपर्यंत प्रदेश कार्यालयाला अहवाल मिळणार आहे. पक्षाची ताकद आणि संभाव्य उमेदवारांबाबत हा प्राथमिक अहवाल आहे.
कोल्हापूर- वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनची कोल्हापूरकरांची प्रतिक्षा आज संपणार आहे. आज दुपारी चार वाजता कोल्हापूर ते पुणे मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिसीद्वारे फ्लॅग ऑफ होणार आहे. कार्यक्रमाआधी भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून रेल्वे स्थानकाची पाहणी करण्यात आली. कोल्हापूर ते मुंबई मार्गावर वंदे भारत आणि कोल्हापूर ते मुंबई याच मार्गावर एक विशेष रेल्वे सेवा सुरू करण्यासाठीदेखील प्रयत्न सुरू असल्याची माहिती धनंजय महाडिक यांनी दिली.
स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. स्पर्धा परीक्षेत होणारा विलंब, त्यातून विद्यार्थ्यांमध्ये झालेला असंतोष याप्रकरणी मार्ग काढण्याबाबत हे पत्र लिहिलं आहे. यासंदर्भात शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे भेटीची वेळ मागितली आहे.
मनोज जरांगे आज मध्यरात्री 12 वाजल्यापासून पुन्हा उपोषण करणार आहेत. ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मागणीवर जरांगे ठाम आहेत. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचं औचित्य साधत आजपासून ते पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात करणार आहेत.
“मला राजकारण नको, माझ्या मागण्या मान्य करा. माझं उपोषण म्हणजे सरकारला शेवटची संधी आहे. आमच्या मागण्या मान्य करा, अन्यथा आम्हाला बोलू नका. सरकारने इथं यावं अन्यथा येऊ नये, आमचं आंदोलन सुरू राहणार,” अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली.
बांगलादेश ते ओमान जाणाऱ्या विमानाचं नागपुरात इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. या विमानातील प्रवाशाची प्रकृती बिघडल्याने इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. वैद्यकीय निकड लक्षात घेऊन ही लँडिंग करण्यात आली. वैमानिकासह नियंत्रण कक्षाच्या समन्वयामुळे प्रवाशाचे प्राण वाचले.
मुंबई- आग्रा महामार्गावर थार गाड्या घेऊन जाणारा कंटेनरला भीषण आग लागली आहे. मुंबई आग्रा महामार्गावरील रेसिडेन्सी पार्क हॉटेल जवळी पुलाच्या खाली कंटेनरला आग लागली आहे. नाशिककडून दिल्लीकडे जाणाऱ्या कंटेनरमध्ये सहा थार गाड्या होत्या. शॉक सर्किटमुळे आग लागली. महापालिकेच्या अग्निशामक दलाने तात्काळ आग विझवली आहे. कुठलीही जीवित हानी झाली नाही. थार गाड्यांचा देखील नुकसान नाही.
किमान निर्यात मूल्य रद्द झाल्यानंतर देखील कांदा व्यापारी आणि निर्यातदारांचे हाल होत आहेत. निर्णय झाल्यानंतर देखील सिस्टीम अपडेट न झाल्याने लाखो टन कांदा बॉर्डरवर अडकला आहे. बांग्लादेश बॉर्डर वर 100 ट्रक अडकले आहेत. तर मुंबई पोर्टवर देखील 300 कंटेनर अडकून पडले आहेत. नाशिकच्या जनोरीमध्ये देखील निर्यातीसाठी साठी जाणाऱ्या 70-80 अडकले आहेत. सिस्टीम अपडेट नसल्याने कस्टमचे कागदपत्र तयार करण्यास अडचण येत आहे. जहाज निघून गेल्यास लाखो टन कांदा सडून जाण्याची भीती आहे. केंद्रीय पातळीवरून हस्तक्षेप करण्याची कांदा निर्यातदारांनी मागणी केली आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निवडणुकीवर बोलताना शिंदे सरकारवर टीका केली आहे. जिथे पराभव दिसतो तिथे भाजप निवडणुका घेत नाही. हारण्याच्या भीतीने भाजपने 14 महापालिकेच्या निवडणुका घेतलेल्या नाहीत, असं संजय राऊत म्हणालेत.
जळगावात गुजराल पेट्रोल पंपाजवळील एका बियर बार मध्ये तोडफोड करत दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. बिअर फुकटात दिली नाही म्हणून हॉटेलच्या मॅनेजरच्या डोक्यात बाटली फोडून साडेतीन लाख लुटल्याचाही प्रकार यावेळी घडला आहे. फुकटात बियर दिली नाही म्हणून तीन ते चार जणांनी मॅनेजर सोबत वाद घातला. या वादातून हॉटेलमध्ये तोडफोड करत तसेच दगडफेक केली. या घटनेमध्ये बियर बारचे मॅनेजर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याच दरम्यान हॉटेलमधील साडेतीन लाख रुपयांची रोकड लांबवून तरुण पळून गेल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेतील एका संशयीताला पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. जखमी व्यवस्थापकांना घेऊन जात जिल्हापेठ पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.
– नाशिक मध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी राहणार मोठा पोलीस बंदोबस्त
– पोलीस अधिकाऱ्यांसह तब्बल 900 पोलीस कर्मचारी आणि विशेष सीमा सुरक्षा दल बंदोबस्तासाठी राहणार तैनात
– उद्या गणपती विसर्जनासाठी शहरातील वाहतूक मार्गात मोठ्या प्रमाणात बदल
– शहरातून जाणाऱ्या आणि येणाऱ्यांसाठी पर्यायी रस्त्यांची व्यवस्था
– जुन्या नाशिक परिसरातील वाकडी बारव या ठिकाणाहून होणार सार्वजनिक गणेश मंडळांच्या मिरवणुकीला सुरुवात
– मिरवणूक शांततेत पार पडण्यासाठी पोलिसांची विशेष खबरदारी
मध्य रेल्वे आज पुन्हा विस्कळीत
कल्याणहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्सला येणाऱ्या लोकल गाड्या पाच ते दहा मिनिटे उशिराने सुरू
धुकं, लांब पल्ल्यांच्या गाड्या व तांत्रिक कारणाने मध्य रेल्वे विस्कळीत असल्याची माहिती
छत्रपती संभाजीनगर : मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांच्या विरोधात वाहतूक पोलिसांनी कारवाईची मोहीम सुरू केली आहे.रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी ३३५ वाहन चालकांची ब्रेथ ॲनालायझर यंत्राद्वारे तपासणी केली. त्यात २१ वाहनचालकांनी मद्यपान केल्याचे समोर आले.वाहन चालकांनी दारूच्या नशेत वाहन चालविल्याने अनेक अपघात होत असल्याचे समोर आले आहे.त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे.
नवी दिल्ली – मोदी सरकारचा 100 दिवसांचा कार्यकाळ पूर्ण
मोदी सरकार पुन्हा एकदा एक देश एक निवडणूक राबवण्यावर निर्णय घेण्याची शक्यता
मोदींच्या कार्यकाळातच देशात एक देश एक निवडणूक करण्याचा संकल्प
वेळ आणि पैशांची बचत करण्यासाठी केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता
एक देश एक निवडणुकीला अनेक राजकीय पक्षांचा पाठिंबा
2029 पासून देशभरात एक देश एक निवडणूक संकल्पना राबवली जाण्याची शक्यता
उद्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण
ध्वजारोहणासाठी मुख्यमंत्री आजच येणार छत्रपती संभाजी नगरच्या दौऱ्यावर
17 सप्टेंबर अर्थात मराठवाडा मुक्ती संग्रामदिनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दरवर्षी होतं ध्वजारोहण
यंदाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण
17 सप्टेंबर रोजी मराठवाड्याला मिळाला होतं स्वातंत्र्य
पिंपरी चिंचवड -औद्योगिक नगरी असलेल्या पिंपरी- चिंचवड मध्ये पिस्तूल विक्री करणाऱ्या तस्करासह एकूण पाच जणांना मालमत्ता विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या
-5 जणांकडून एकूण 7 पिस्तूल 14 जिवंत काडतुसासह 16 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला
-नवल झामरे हा पिस्तूल विक्री करणारा तस्कर आहे. झामरे हा मध्यप्रदेशातून पिस्तूल आणून औद्योगिक नगरी पिंपरी-चिंचवड मध्ये विक्री करत असल्याच समोर आलं आहे.
-अटक करण्यात आलेल्या पाचपैकी पवन शेजवळ याच्यावर हत्येचा गुन्हा दाखलय.कमलेश कानडे याच्यावर पाच घरफोडीची गुन्हे दाखलयत.
पुणे – सतत वादात असणाऱ्या ससून रुग्णालयातील आणखी एक घोटाळा उघड,
– ससूनच्या कर्मचाऱ्यांनीच चार कोटी १८ लाख ६२ हजार रुपयांचा केला अपहार
– याप्रकरणी रुग्णालयाचे अकाउंटंट अनिल माने, रोखपाल सुलक्षणा चाबुकस्वार यांच्यासह २३ कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
– याबाबत ससूनचे प्रशासकीय अधिकारी गोरोबा आवटे यांनी फिर्याद दिली आहे,
– ससून रुग्णालयाच्या शासकीय नोंदवहीत आर्थिक तफावत असल्याची बाब समोर