रतन टाटा यांचं कुटुंब प्रसिद्धीच्या झोतापासून नेहमीच लांब राहिलय. त्यांच्या कुटुंबाबद्दल फार कमी लोकांना माहितीय. रतन टाटा अविवाहीत होते. रतन टाटा यांचे वडिल, आजोबा, पणजोबा कोण होते? त्यांच्या कुटुंबात आता किती सदस्य आहेत, जाणून घ्या Family Tree बद्दल. वाचा सविस्तर…
रतन टाटा यांचं पार्थिव अंत्य दर्शनासाठी मुंबईतील NCPA येथे ठेवण्यात आलं आहे. दुपारी 4 वाजेपर्यंत पार्थिव येथे असेल. समाजाच्या विविध क्षेत्रातील सर्वच मंडळी पार्थिवाच्या दर्शनासाठी येत आहेत.
मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्यात अतिरेक्यांनी ताज हॉटेलला टार्गेट केलं होतं. त्यावेळी रतन टाटा तिथे पोहोचलेले. त्यावेळी रतन टाटांचा सुरक्षा रक्षकांसोबत काय संवाद झालेला? वाचा सविस्तर….
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी मुंबईतील एनसीपीए लॉनमध्ये रतन टाटा यांना अखेरची आदरांजली वाहिली.
#WATCH | Maharashtra deputy CM Ajit Pawar and NCP working president Praful Patel pay last respect to Ratan Tata, at NCPA lawns, in Mumbai pic.twitter.com/UMhUB3Zqdh
— ANI (@ANI) October 10, 2024
राज्य सरकारच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जन-कल्याण कक्ष यांच्यामार्फत ही योजना राबविली जात आहे. या उपक्रमांर्तगत ‘https://rojgar.mahaswayam.gov.in/’ संकेतस्थळाद्वारे रोजगार इच्छुकांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या कंपन्यांशी जोडण्यात येणार आहे.
बारावी, आयटीआय, पदविका, पदवी आणि पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता असलेले विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. कार्य प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिने असणार आहे. प्रशिक्षणासाठी १८ ते ३५ वयोगट असावा, शिक्षण विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे.
“रतन टाटा हे असे एक उद्योगपती होते ज्यांनी आपल्या कमाईचा 25 टक्के हिस्सा हा भारताच्या विकासासाठी दिला. सामाजिक क्षेत्रासाठी दिला. टाटा हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांनी आरोग्य क्षेत्रात भरीव कामगिरी केली. रतन टाटा यांनी जेव्हा टाटा समूहाचा कारभार हाती घेतला तेव्हा त्यांनी उद्योग क्षेत्राला वेगळी कलाटणी देण्याचं काम केलं. मी प्रहार आणि माझ्या शेतकरी बांधवाकडून रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण करतो,” अशा शब्दांत बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली.
नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मध्यरात्रीपर्यंत दांडियाला परवानगी देण्यात आली आहे. नवरात्रौत्सवामध्ये मध्यरात्रीपर्यंत रास-दांडिया-गरबा खेळण्यासाठी तीन दिवसांची परवानगी देण्यात आली आहे. दहाच्या वाजताच्या ठोक्याला बंद होणारा डीजे आता रात्री बारा वाजता बंद होणार आहे. अन्य दिवस रात्री 10 वाजेपर्यंत चालणाऱ्या दांडिया गरबाला शेवटचे तीन दिवस बारा वाजेपर्यंत परवानगी आहे.
रतन टाटा हे उद्योग जगतातील मोठं नाव आहे. कोरोना काळात त्यांनी अनेकांना मदत केली. मुंबई शहरासाठी रतन टाटांचं योगदान मोठं आहे. टाटा गेले यावर विश्वासच बसत नाही.
राज ठाकरे यांनी रतन टाटा यांच्याबाबतच एक पोस्ट फेसबुकवर शेअर केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांशी या जगात कोणाचीच तुलना होऊ शकत नाही. पण समर्थ रामदास स्वामींनी महाराजांचं वर्णन जसं अचूक केलं आहे तसं इतर कुठे आढळत नाही. त्यात त्यांनी महाराजांना ‘श्रीमंत योगी’ म्हणलं आहे, रतन टाटांबद्दल विचार करताना, ‘श्रीमंत योगी’ ही उपमा तंतोतंत पटते. श्रीमंत असून देखील त्यांनी आपल्या श्रीमंतीचा तमाशा कधी मांडला नाही. असा माणूस पुढच्या पिढयांना पहायला न मिळणं ही अधिक दुःखाची बाब, असं म्हणत राज ठाकरेंनी रतन टाटांना श्रद्धांजली अर्पण केली.
रतन टाटा यांचं निधन झालं. त्यानंतर आता त्यांच्या कुलाब्यातील घराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी काहीच वेळात सुरुवात होईल.
रतन टाटा यांचा तरूण जिवलग मित्र शांतनू नायडू याने खास पोस्ट लिहिली आहे. माझं लाईटहाऊस मला सोडून गेलं, अशा शब्दात शांतनू नायडूने त्याच्या भावना व्यक्त केल्यात.
रतन टाटा असे एक उद्योगपती होते ज्यांनी आपल्या कमाईचा 25 टक्के हिस्सा हा भारताच्या विकासासाठी दिला.सामाजीक क्षेत्रासाठी दिला. टाटा हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांनी आरोग्य क्षेत्रात भरीव कामगिरी केली.रतन टाटा यांनी जेव्हा टाटा समूहाचा कारभार हाती घेतला तेव्हा त्यांनी उद्योग क्षेत्राला वेगळी कलाटणी देण्याचं काम केलं. मी प्रहार आणि माझ्या शेतकरी बांधवाकडून रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण करतो, असं बच्चू कडू म्हणाले.
Ratan Tata Passed Away Live Update : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण केली. ‘भारताचे सुपुत्र, पद्म विभूषण रतन टाटा यांच्या निधनाने एक महान उद्योजक आणि सामाजिक क्षेत्रातील आदर्श नेतृत्वाने आज जगाचा निरोप घेतला आहे. आपल्या योगदानाने उद्योग, समाजसेवा आणि मानवतेसाठी नवीन आदर्श रतन टाटा यांनी लोकांपुढे ठेवला. देश संकटात असताना अनेक प्रसंगावर त्यांनी देशासाठी दिलेल्या निस्वार्थ योगदानाची परतफेड कधीच होऊ शकणार नाही, असे ते म्हणाले.
“भारताचे सुपुत्र, पद्म विभूषण रतन टाटा यांच्या निधनाने एक महान उद्योजक आणि सामाजिक क्षेत्रातील आदर्श नेतृत्वाने आज जगाचा निरोप घेतला आहे.
आपल्या योगदानाने उद्योग, समाजसेवा आणि मानवतेसाठी नवीन आदर्श रतन टाटा यांनी लोकांपुढे ठेवला. देश संकटात असताना अनेक प्रसंगावर त्यांनी… pic.twitter.com/YsiwCeqXdY
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) October 9, 2024
Ratan Tata Passed Away Live Update : रतन टाटा यांच्या निधनाचे वृत्त समजताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी X (ट्विटर) वरून त्यांना श्रद्धांजली वाहिली. ‘श्री रतन टाटा हे एक दूरदर्शी बिझनेस लीडर, दयाळू आणि विलक्षण माणूस होते. भारतातील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित व्यावसायिक घराण्यांना त्यांनी स्थिर नेतृत्व दिले. नम्रता, दयाळूपणा आणि आपल्या समाजाला अधिक चांगले बनवण्याच्या अतूट बांधिलकीमुळे ते लोकप्रिय ठरले, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शोक व्यक्त केला.
Shri Ratan Tata Ji was a visionary business leader, a compassionate soul and an extraordinary human being. He provided stable leadership to one of India’s oldest and most prestigious business houses. At the same time, his contribution went far beyond the boardroom. He endeared… pic.twitter.com/p5NPcpBbBD
— Narendra Modi (@narendramodi) October 9, 2024
Ratan Tata Passed Away Live Update : रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ राज्यात आज एक दिवसाचा दुखवटा पाळण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली आहे. या काळात राज्यातील शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात येतील. रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
Ratan Tata Passed Away Live Update : प्रसिद्ध उद्योपती रतन टाटा यांचे काल निधन झालं. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. रतन टाटा हे 86 वर्षांचे होते. प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रविवारी रात्री उशिरा मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी टाटा यांनी ट्विट करत आपल्या प्रकृतीची माहिती दिली होती. “माझ्या प्रकृतीविषयी अफवा पसरली आहे. पण माझे वय लक्षात घेता आणि सध्याची माझी प्रकृती पाहता माझ्या काही वैद्यकीय तपासण्या केल्या जात आहेत. त्यामुळे काळजी करण्यासारखं कोणतेही कारण नाही”, असं रतन टाटा म्हणाले होते.
मात्र बुधवारी संध्याकाळी रतन टाटा यांची प्रकृती जास्त खालावली. प्रकृती खालावल्यामुळे रतन टाटा यांना ब्रीच कँडी रुग्णालयात आयसीयूत दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर तज्ञ डॉक्टरांकडून उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान बुधवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.
Ratan Tata Passed Away Live Update : टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा आणि जगातील मोठे उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी (9 ऑक्टोबर) निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. भारताच्या उद्योग क्षेत्रातील बापमाणूस म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने केवळ उद्योगजगतावर नव्हे तर संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. रतन टाटा यांना प्रकृती खालावल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. रतन टाटा यांच्या निधनानंतर कोट्यवधी भारतीयांच्या डोळ्यात पाणी पाहायला मिळत आहे. तसेच रतन टाटा यांच्या निधनानंतर देशभरातून मान्यवरांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. तसेच सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.