आमदार शहाजी बापू पाटलांच्या,’ काय झाडी, काय डोंगारने..आसामचे पर्यटक वाढले

| Updated on: Nov 02, 2023 | 3:49 PM

शिवसेनेत ज्यावेळी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने मोठी फूट घडवून आणली होती. त्यावेळी शिवसेनेच्या 40 बंडखोर आमदारांना आसामच्या गुवाहाटी शहरातील हॉटेल 'रेडिसन्स ब्लू' मध्ये ठेवण्यात आले होते. त्यावेळच्या शहाजी बापू पाटील यांच्या, 'काय झाडी, काय डोंगार.. डायलॉग प्रसिद्ध झाला होता.

आमदार शहाजी बापू पाटलांच्या, काय झाडी, काय डोंगारने..आसामचे पर्यटक वाढले
shahaji bapu patil
Image Credit source: socialmedia
Follow us on

प्रदीप कापसे, आसाम | 2 नोव्हेंबर 2023 : ” काय झाडी…काय डोंगार…काय हाटील…एकदम ओके हा शहाजीबापू यांचा डायलॉग शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंडखोरी झाली तेव्हा प्रचंड फेमस झाला होता. शहाजीबापू पाटील जेव्हा बंडखोर आमदारांसोबत गुवाहाटीला गेले होते, तेव्हा त्यांच्या मित्रामध्ये झालेला हा संवाद तेव्हा खूपच व्हायरल झाला होता. या व्हायरल डायलॉगने जेवढी सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांना प्रसिद्धी मिळाली तितकीच प्रसिद्धी आता आसामच्या पर्यटनाला मिळत आहे. आसाम आणि तेथील कामाख्या देवीचे मंदिर पाहायला महाराष्ट्रातून येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे.

शिवसेनेत ज्यावेळी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने मोठी फूट घडवून आणली होती. त्यावेळी शिवसेनेच्या 40 बंडखोर आमदारांना आसामच्या गुवाहाटी शहरातील हॉटेल ‘रेडिसन्स ब्लू’ मध्ये ठेवण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्या एका मित्राचा त्यांना अचानक फोन आला. त्यावेळी हॉटेलात आल्यानंतर ते खिडकी तेथील निसर्ग सौदर्य पाहात असतानाच त्यांच्या मित्राने पलिकडून काय दोन-चार दिवस फोन नाय, काय नाय, कुठंय म्हटल्यावर त्यांनी खिडकी समोरील डोंगराकडे पाहून म्हटलं होतं, काय डोंगार, काय झाडी…काय हाटील…एकदम ओकेमध्ये आहे सगळं रफीक भाई.. अशा शब्दात आसामच्या निसर्ग सौदर्याचे वर्णन केले. हे संभाषण खूपच व्हायरल झाल्याने आसाममध्ये महाराष्ट्रातील पर्यटक येण्याचे प्रमाण वाढल्याचे म्हटले जाते.

कामाख्या देवी दर्शन सुलभ होणार

आसामला भेट देणाऱ्या पर्यटकांचे प्रमाण खूप वाढले आहेत. आसामला कामाख्या देवीचे मंदिर असून या मंदिरात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर दर्शन घेऊन कामाख्या देवीचे आशीर्वाद घेतले होते. आता कामाख्या देवीचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातून पर्यटक मोठ्या प्रमाणावर येत आहेत. आसामचे पर्यटन विभागाचे सचिव कुमार बोरा यांनी पर्यटक वाढण्यासाठी अनेक योजना आखल्याचे त्यांनी सांगितले. कामाख्या देवीला येणाऱ्या पर्यटकांसाठी स्पेशल कॉरिडॉर उभारण्याची योजना आहे. त्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर वाढविण्याची योजना असून दिव्यांग पर्यटकांच्या सोयीसाठी लिफ्ट वगैरे सुविधा उभारण्याची योजना आहे. महाराष्ट्रातून येणारा पर्यटक नेहमीच जास्त आहे. दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर फूटफॉल आहे. आसाममध्ये चहाचे मळे असल्याने ते पहाण्यासाठी पर्यटक यावेत यासाठी ‘टी टुरिझम’ करण्याची योजना असल्याचेही कुमार बोरा यांनी सांगितले. काझीरंगा येथे गेंडे पाहण्यासाठी लोक येत असतात त्यांना अधिक सुविधा देण्यात येणार आहे.