Rahul Gandhi : …तर नरेंद्र मोदी यांचा दोन ते तीन लाख मतांनी पराभव निश्चित होता, राहुल गांधी यांचा सर्वात मोठा दावा

| Updated on: Jun 11, 2024 | 10:06 PM

लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विश्वासार्हता कमी होत असल्याचं गांधी यांनी म्हटलं आहे.

Rahul Gandhi : ...तर नरेंद्र मोदी यांचा दोन ते तीन लाख मतांनी पराभव निश्चित होता, राहुल गांधी यांचा सर्वात मोठा दावा
Follow us on

लोकसभा निवडणुका पार पडल्या असून एनडीए सरकार स्थापन झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. इंडिया आघाडीने भाजपला सत्तेत येण्यापासून रोखलं, मात्र नितीशकुमार आणि चंद्राबाबू नायडू यांना सोबत घेत भाजपने एनडीए सरकार स्थापन केलं. भाजपलाही काही राज्यात कमी प्रमाणात मतदान झालं. मोदी स्वत: एक लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने विजयी झाले होते. याचाच धागा पकडत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोठा दावा केला आहे.

काय म्हणाले राहुल गांधी?

प्रियंका गांधी वाराणसीत लढल्या असत्या तर आज भारताच्या पंतप्रधानांचा वाराणसी निवडणुकीत दोन-तीन लाख मतांनी पराभव झाला असता. मी हे अहंकारातून बोलत नाही, कारण भारतातील जनतेने पंतप्रधानांना संदेश दिला आहे की तुमचे राजकारण आम्हाला आवडले नाही आणि आम्ही विरोधात आहोत. आम्ही द्वेषाच्या, हिंसेच्या विरोधात आहोत, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

मी काँग्रेस पक्षाचे सर्व नेते आणि सदस्य आणि अमेठी आणि रायबरेलीच्या जनतेचे आभार मानू इच्छितो. यावेळी काँग्रेस पक्ष अमेठी, रायबरेली, उत्तर प्रदेश आणि संपूर्ण देशात एकदिलाने लढला.तुम्ही संपूर्ण देशाचे राजकारणच बदलून टाकले आहे. संविधानाला हात लावला तर बघा जनता काय करतील, असा संदेश जनतेने देशाच्या पंतप्रधानांना दिला असल्याचं राहुल गांधी म्हणाले.

पाहा व्हिडीओ:-

दरम्यान, राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. दोन्ही ठिकाणी राहुल गांधी यांनी विजय मिळवला. रायबरेली मतदारसंघात त्यांनी सभा आयोजित केली होती. यावेळी बोलताना त्यांनी थेट पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विश्वासार्हता कमी होत असल्याचं गांधी म्हणाले.