जीवनात सुख आणि दु:ख एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हा जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. मात्र, अशा परिस्थितीत आचार्य चाणक्यांच्या काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर वाईट काळापासून दूर राहू शकतो.
आचार्य चाणक्य यांच्या मते, मूर्ख व्यक्तीला ज्ञान देणे आणि त्याच्याकडून ज्ञान घेणे टाळावे. असे केल्याने आपला वेळ वाया जातो. असे केल्याने विनाकारण वाद वाढण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे अशा लोकांपासून अंतर ठेवणे चांगले.
वागणूक नम्र करा - आचार्य चाणक्य यांच्या मते, आपण प्रत्येक व्यक्तीशी सभ्यतेने वागले पाहिजे. कोणीही आयुष्यात कधीही कामी येऊ शकतो. अशा व्यक्ती जीवनात नेहमीच यशस्वी होतात. त्या प्रत्येक क्षेत्रात आपले नाव काढतात.
देवाची उपासना करा - जीवनात चांगले असो वा वाईट, वेळ कोणतीही आली तरी नेहमी देवाचे कृतज्ञ रहा. भगवंताची भक्ती मनाला शांती तर देतेच पण वाईट काळात धैर्यही देते. एक सकारात्मक उर्जा आपल्याला मिळते.
गरिबांना दान करा - आचार्य चाणक्य यांच्यानुसार नेहमी गरजू आणि गरीबांना दान करा. तसे करणे हे पुण्य आहे. याने भगवंताची कृपा सदैव तुमच्यावर राहते. यामुळे तुमच्या मनाला शांतीही मिळते. वाईट काळातही त्याचा उपयोग होतो.