आचार्य चाणक्य हे अर्थशास्त्रातही माहिर होते. चाणक्य यांनी सांगितलेली निती आजही प्रासंगिक असल्याची प्रचिती वेळोवेळी येते.आ पण ज्याच्यावर विश्वास ठेवतो तीच व्यक्त विश्वासघात करते, हे असं अनेकदा घडतं. अशा वेळी आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या काही गोष्टी आपण लक्षात ठेवायला हव्यात.
चाणक्य यांच्यानुसार, पैसे कमावण्यासह ते योग्य ठिकाणी खर्च केल्याने तुमची प्रगती होते. उलटपक्षी चुकीच्या ठिकाणी खर्च केल्यास नुकसान अटळ आहे. पैशांचा योग्य वापर केल्यास नशिब फळफळंत. तसंच अधिकाअधिक यश मिळतं.
चाणक्य यांच्यानुसार, व्यक्तीने दुसऱ्यांच्या चुकांमधून धडा घ्यायला हवा. असं केल्यास तुमच्याकडून तशीच चूक होण्याची शक्यता कमी होते. यामुळे समाजात तुमची प्रतिमा उंचावते आणि मान-सन्मान मिळतो
चाणक्य यांच्यानुसार, खोटं बोलून मिळालेलं यश ही क्षणिक असतं, ते फार काळ टिकत नाही. खोटं बोलणारी व्यक्ती उद्धवस्त होते. उलटपक्षी जी व्यक्ती सत्याच्या मार्गावर चालते ती आव्हानात्मक स्थितीतूनही सहज बाहेर पडते.
एखादी व्यक्ती ज्ञान मिळवते किंवा आर्थिकरित्या श्रीमंत होते, तेव्हा ती समोरच्या व्यक्तीला हलक्यात घेते. चाणक्यानुसार, कधीही दुसऱ्या व्यक्तीला कमजोर समजू नये.