अभिनेत्री संस्कृती बालगुडे तिचं मतं स्पष्टपणे मांडत असते. विविध विषयांवर ती परखड मतं मांडत असते. आताही एका मुलाखती दरम्यान संस्कृतीने राष्ट्रगीत आणि लोकांच्या वर्तणुकीविषयी तिचं मत मांडलं आहे.
राष्ट्रगीतावेळी जे लोक स्वस्थ उभं राहत नाहीत. त्यांच्याविषयी मला जराही आदर नाही. आपलं राष्ट्रगीत दोन मिनिटांचं देखील नाहीय. तरिही तुम्ही शांत उभं राहू शकत नाहीत?, असं म्हणत संस्कृतीने राष्ट्रगीताचा अनादर करणाऱ्यांबद्दलचा राग व्यक्त केला आहे.
शाळा- कॉलेजनंतर 10 - 12 वर्षांनंतर आपण राष्ट्रगीत म्हणत असतो. तसं रोज आपण राष्ट्रगीत म्हणत नाही. पण जेव्हा त्याचे शब्द कानी पडतात तेव्हा त्याचा आदर केला गेला पाहिजे, असं संस्कृती म्हणाली आहे.
खूप वर्षांनंतर दोन दिवसांआधी शाळेत म्हणायचो तसं मी मनसोक्तपणे राष्ट्रगीत म्हटलं. खूप भारी वाटलं. ती भावनाच वेगळी आहे... खूप भारी वाटतं राष्ट्रगीत म्हणताना..., असं संस्कृती म्हणाली.
दोन मिनिटं देशासाठी आपण देऊच शकतो. पण जे लोक राष्ट्रगीताचा आदर करत नाहीत. त्यांच्याबद्दल मला वाईट वाटतं. दोन मिनिट तुम्ही देशासाठी दिलीच पाहिजेत, असं परखड मत संस्कृती बालगुडेने व्यक्त केलं.