टीम इंडिया आणि इंग्लंडमधील सेमीफायनलचा सामना प्रोव्हायडन्स स्टेडियममध्ये होणार आहे. हा सामना संध्याकाळी 8 वाजता सुरू होणार असून 7.30 वाजता सामन्याचा टॉस होणार आहे.
टीम इंडियाला इंग्लंड टीमने याआधी सेमी फायनलमध्ये पराभव करत स्पर्धेतून बाहेर केलंय. रोहित अँड कंपनीसाठी बदला घेण्याची नामी संधी आहे. यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने एकही सामना गमावलेला नाही.
गायनच्या संथ खेळपट्टीवर कुलदीप यादव आपली जादू दाखवू शकतो. त्याला फक्त तीन सामने खेळण्याची संधी मिळाली असून त्यात त्याने सात विकेट्स घेतल्या आहेत. संघात आल्यापासून तो विरोधी संघाची मधली फळी उद्ध्वस्त करत आहे. कुलदीपची गुगली वाचणे प्रत्येक फलंदाजाच्या आवाक्यात नाही.
रोहितने सामना संपल्यावर सांगितलं होतं की पुढील सामन्यातही संघात फार काही बदल दिसणार नाही. त्यामुळे रोहित आधीचीच टीम इंग्लंडविरूद्ध मैदानात उतरवणार हे स्पष्ट आहे.
टी-२० वर्ल्ड कप साठी टीम इंडियाच्या स्क्वॉडमध्ये असे चार खेळाडू आहेत ज्यांनी एकही टी-२० सामना इंग्लंडविरूद्ध खेळलेला नाही. संजू सॅमसन, मोहम्मद सिराज, यशस्वी जयस्वाल आणि शिवम दुबे हे खेळाडू आहेत. मात्र यामधील फक्त शिवम दुबे प्लेइंग 11 मध्ये खेळत आहे. बिग हिटर शिवम आता रोहितने दाखवलेल्या विश्वासाला सार्थ ठरवतो की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.