देशातील स्वातंत्र्य चळवळीत टाटा, बिर्ला, बजाज, महिंद्रा अशी अनेक श्रीमंत कुटुबांनी हिरारीने सहभाग घेतला. त्यावेळी ही कुटुंब श्रीमंत होती. त्यांचे उद्योग भरभराटीला होते. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत मोठे योगदान दिले. त्यांनी पण हालअपेष्टा सहन केल्या. त्यांच्या काही वास्तू चळवळीसाठी दिल्या. अनेकांना मदतीचा हात दिला. आज पण या कुटुंबाकडे अफाट संपत्ती आहे. त्यांचे उद्योग भरभराटीला आले आहेत. त्यांची आताची पिढी अब्जाधीश आहे. त्यांनी हजारो हातांना रोजगार दिला आहे.
भारत आज स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहे. स्वातंत्र्याचा 76 वर्षोंचा कालावधी उलटून गेला आहे. स्वातंत्र्यासाठी अनेकांना प्राणाची आहुती दिली. अनेकांनी हालअपेष्टा सहन केल्या. काहींनी आर्थिक योगदान दिले. त्यावेळी काही श्रीमंतांनी, श्रीमंती नाकारुन भरड कपडे घातले. त्यांचे उद्योग बहरले. आजही त्यांच्या पिढीचा जलवा कायम आहे.
भारत 1947 मध्ये स्वतंत्र झाला. त्यावेळी देशातील अब्जाधीशांमध्ये टाटा, बिर्ला, बजाज, महिंद्रा यांचे नाव आहे. हैदराबादचा निजाम मात्र त्यांच्यापेक्षा श्रीमंत होता. त्याच्याकडे अफाट माया होती. तो प्रचंड श्रीमंत होता.