महाराष्ट्र काँग्रेसमधील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणारा आक्रमक नेता म्हणून महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ओळखले जातात. आपली आक्रमकता योग्य ठिकाणी वापरण्यात हे माहीर आहेत.
नाना पटोले हे भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून भाजपचे खासदार होते. 2014 ते 2017 या कालावधीत त्यांनी भाजपच्या तिकीटावर खासदारकी भूषवली. 2017 मध्ये नाना पटोलेंनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आणि काँग्रेसमध्ये सहभागी झाले.
नाना पटोले यांनी 2019 मध्ये नितीन गडकरी यांच्याविरोधात नागपूर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली. मात्र, त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
त्यानंतर त्यांनी साकोली मतदारसंघातून भाजपच्या परिणय फुके यांच्याविरोधात विधानसभा निवडणूक लढवली. यामध्ये ते विजयी होऊन विधानसभेवर निवडून आले.
शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत आक्रमक असलेल्या नाना पाटोळे यांनी शेतकऱ्याच्या अडचणी सोडवण्यात भाजप सरकार अपयशी ठरत आहे, असं थेट हल्लाबोल करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती .
चांगल्या दर्जाचे सोयाबीन बियाणे आणि कमी किमतीमध्ये शेतकऱ्यांना मिळेल अशा प्रकारचे धोरण राज्य सरकारने करावे. महागडे बियाणे शेतकऱ्यांना देऊ नये.यासाठीही आग्रही राहिले दिसून येतात.