भारताचे पहिले बजेट 164 वर्षांपूर्वी जेम्स विल्सन यांनी 18 फेब्रवारी,1860 रोजी सादर केले होते. James हे व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंग यांच्या काऊंसिलमधील वित्त सदस्य होते.
बजेटसंदर्भातील काही परंपरा अनेक दशकांपासून सुरु आहे. हलवा सेरेमनी त्यातीलच एक आहे. स्वतंत्र भारताचे पहिला अर्थसंकल्प 26 नोव्हेंबर 1947 रोजी सादर झाला होता. आर. के. षणमुखम चेट्टी यांनी संध्याकाळी 5 वाजता बजेट सादर केले होते.
1947 ते 1955 पर्यंत बजेट केवळ इंग्रजी भाषेतच सादर होत होते. त्यानंतर इंग्रजीसोबतच ते हिंदी भाषेत सादर होऊ लागले. या बदलाचे श्रेय सी.डी.देशमुख यांना जाते. ते भारताचे तिसरे अर्थमंत्री होते.
त्यानंतर सर्वात मोठा बदल झाला तो 1999 मध्ये. ब्रिटिश काळात, टाईम झोन प्रमाणे भारतात संध्याकाळी 5 वाजता अर्थसंकल्प सादर होत होता. 1999 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारने मोठा बदल केला. तत्कालीन अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी ही परंपरा तोडली. बजेट सकाळी 11 वाजता सादर झाले.
पूर्वी अर्थसंकल्प हा फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस सादर होत असे. पण 2017 मध्ये ही परंपरा मोडीत निघाली. अरुण जेटली यांनी 2017 मध्ये पहिल्यांदा 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला.
92 वर्षांपासून सुरु असलेली परंपरा अरुण जेटली यांच्या कार्यकाळात संपली. 2017 मध्ये रेल्वे बजेट सर्वसाधारण बजेटमध्ये सामावले. 1924 पासून रेल्वे बजेट स्वतंत्रपणे सादर होत होते.
गेल्यावर्षी निर्मला सीतारमण यांनी लाल रंगाच्या चामडी ब्रीफकेसऐवजी चोपडीचा वापर केला. त्यापूर्वी ब्रीफकेसमध्ये पेपर्स आणण्याची पद्धत होती. ती बंद झाली. कोरोना काळात तर कागदाऐवजी टॅबवर पेपरलेस बजेट सादर झाले.