IND vs SA Final : ‘मी फायनलच्याआधी रात्रभर झोपू नाही, पण…’; रोहित शर्माने केला मोठा खुलासा

| Updated on: Jun 30, 2024 | 3:22 AM

टीम इंडियाच्या हातातून सामना गेल्यात जमा होता. मात्र रोहितने न खचता आपल्या गोलंदाजांकडून फायनल सामना काढून घेत इतिहास रचला. या सामन्यानंतर बोलताना रोहितने बोलताना मोठा खुलासा केला.

1 / 5
टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिकेमधील फायनल सामन्यात भारताच्या वाघांनी विजय मिळवला. भारतासह देशभरात मोठा जल्लोष पाहायला मिळाला.

टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिकेमधील फायनल सामन्यात भारताच्या वाघांनी विजय मिळवला. भारतासह देशभरात मोठा जल्लोष पाहायला मिळाला.

2 / 5
टीम इंडियाने दिलेल्या १७६-७ धावांचा पाठलाग करणाऱ्या साऊथ आफ्रिका संघाला २० ओव्हरमध्ये १६९-८ धावा करता आल्या. थरारक सामन्यात टीम इंडियाने आठ धावांनी विजय मिळवला.

टीम इंडियाने दिलेल्या १७६-७ धावांचा पाठलाग करणाऱ्या साऊथ आफ्रिका संघाला २० ओव्हरमध्ये १६९-८ धावा करता आल्या. थरारक सामन्यात टीम इंडियाने आठ धावांनी विजय मिळवला.

3 / 5
विराट कोहली याने फायनल सामन्यामध्ये ७६ धावांची दमदार खेळी केली. त्यामुळे टीम इंडियाला आव्हानात्मक धावसंख्या उभारत आली. विराट कोहलीला मॅन ऑफ द मॅच म्हणून गौरवण्यात आलं. तर टी-२० क्रिकेटमधून विराटने निवृत्ती जाहीर केली आहे. रोहितने आपली प्रतिक्रिया देताना आपलं मन मोकळं करून बोलला.

विराट कोहली याने फायनल सामन्यामध्ये ७६ धावांची दमदार खेळी केली. त्यामुळे टीम इंडियाला आव्हानात्मक धावसंख्या उभारत आली. विराट कोहलीला मॅन ऑफ द मॅच म्हणून गौरवण्यात आलं. तर टी-२० क्रिकेटमधून विराटने निवृत्ती जाहीर केली आहे. रोहितने आपली प्रतिक्रिया देताना आपलं मन मोकळं करून बोलला.

4 / 5
मी सकाळी उठलो खरा पण रात्रभर झोपू शकलो नाही. मला माहित होतं की सामना सुरू झाल्यावर मी एक कॅप्टन आणि फलंदाज म्हणून मला काय करायचं आहे. आता मला झालेला आनंद शब्दात सांगणं कठीण आहे, संघातील प्रत्येक खेळाडूकडून काय करायचं हे मला माहिती होतं. मैदानावर असताना 2007, 2011, 2013 सर्व काही डोक्यात येत होतं पण मी शांत राहिलो. कारण जिंकत नाही तोपर्यंत मी सामन्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करून होतो, असं रोहित शर्माने सांगितलं.

मी सकाळी उठलो खरा पण रात्रभर झोपू शकलो नाही. मला माहित होतं की सामना सुरू झाल्यावर मी एक कॅप्टन आणि फलंदाज म्हणून मला काय करायचं आहे. आता मला झालेला आनंद शब्दात सांगणं कठीण आहे, संघातील प्रत्येक खेळाडूकडून काय करायचं हे मला माहिती होतं. मैदानावर असताना 2007, 2011, 2013 सर्व काही डोक्यात येत होतं पण मी शांत राहिलो. कारण जिंकत नाही तोपर्यंत मी सामन्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करून होतो, असं रोहित शर्माने सांगितलं.

5 / 5
टीम इंडियाने ११ वर्षांनंतर आयसीसी ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. तर टी-२० क्रिकेटमध्ये दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकला आहे. धोनीनंतर अशी कामगिरी करणारा रोहित दुसरा कर्णधार ठरला आहे.

टीम इंडियाने ११ वर्षांनंतर आयसीसी ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. तर टी-२० क्रिकेटमध्ये दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकला आहे. धोनीनंतर अशी कामगिरी करणारा रोहित दुसरा कर्णधार ठरला आहे.