आयपीएलच्या 16 व्या पर्वातील अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने गुजरात टायटन्सवर रोमहर्षक विजय मिळवून विजेतेपद पटकावले. यासह सीएसकेने पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे.
याआधी केवळ मुंबई इंडियन्सच्या नावावर हा विक्रम होता. आता चेन्नई सुपर किंग्जनेही ही कामगिरी केली आहे.
सीएसकेच्या या कामगिरीनंतर लखनऊ सुपर जायंट्स संघाचे मार्गदर्शक गौतम गंभीर यांनी केलेल्या ट्विटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
गौतम गंभीरने ट्वीट करत लिहिलं आहे की, चषक जिंकणे कठीण आहे. पाच कप जिंकणं हे अविश्वसनीय आहे.चेन्नई सुपर किंग्सचे अभिनंदन. गंभीरच्या या ट्विटचे चाहत्यांकडून कौतुक होत आहे.
मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स व्यतिरिक्त, कोलकाता नाईट रायडर्स संघाने आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेळा ट्रॉफी जिंकली आहे. ते देखील गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली..
गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्सने 2012 आणि 2014 मध्ये दोनदा विजेतेपद पटकावले होते. यानंतर केकेआरला ट्रॉफी जिंकता आलेली नाही.