श्रीलंकेच्या (India vs Sri Lanka Test Record) संघाला नुकत्याच झालेल्या भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेत 3-0 अशा दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. श्रीलंकेला तीनपैकी एकही सामना जिंकता आला नाही. आता मोहालीत 4 मार्चपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. दुसरी कसोटी बंगळुरूमध्ये खेळवली जाणार असून त्यातही विजयाची मोठी दावेदार टीम इंडियाच आहे. पण इथे प्रश्न केवळ विजयाचा नसून विजयाच्या फरकाचा आहे. टीम इंडिया पुन्हा एकदा श्रीलंकेला क्लीन स्वीप देणार की श्रीलंका भारतीय भूमीवर पहिल्यांदाच भारताला हरवणार? याबद्दल सर्वत्र चर्चा सुरु आहेत. भारताविरुद्ध श्रीलंकेचे कसोटीमधले आकडे खूप खराब असल्याने आगामी कसोटी मालिकेतही भारताचच पारडं जड दिसतंय. (PC-AFP)
श्रीलंका आणि भारत यांच्यात आतापर्यंत एकूण 44 कसोटी सामने खेळले गेले आहेत. भारताने त्यातले 20 आणि श्रीलंकेने 7 कसोटी सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर 17 कसोटी सामने अनिर्णित राहिले आहेत. (PC-AFP)
श्रीलंकेच्या संघाने भारताला कधीही भारतीय भूमीवर पराभूत केलेलं नाही. श्रीलंकेने भारतात 20 कसोटी सामने खेळले आहेत, त्यापैकी 11 सामन्यांमध्ये श्रीलंकेचा पराभव झाला आहे तर 9 कसोटी अनिर्णित राहिल्या आहेत. (PC-AFP)
श्रीलंकेने भारतात 8 कसोटी मालिका खेळल्या आहेत, ज्यात एकाही मालिकेत पाहुण्या संघाला विजय मिळवता आला नाही. भारताने 6 कसोटी मालिका जिंकल्या आहेत आणि 2 अनिर्णित राहिल्या आहेत. (PC-AFP)
श्रीलंकेने 2015 साली भारताविरुद्ध शेवटचा कसोटी विजय मिळवला होता. 7 वर्षांपूर्वी श्रीलंकेने गॉलमध्ये भारताचा पराभव केला होता. उभय संघांमधील कसोटी आकडेवारी पाहता आगामी मालिका जिंकणे श्रीलंकेसाठी सोपं नाही. (PC-AFP)