T20 World Cup 2024 : हे 3 फलंदाज ठरणार प्रतिस्पर्ध्यांसाठी डोकेदुखी, मुंबईच्या एकाचा समावेश

| Updated on: May 10, 2024 | 6:32 PM

Icc T20I World Cup 2024 : टीम इंडियाला 2007 पासून टी 20 आणि 2011 नंतर वनडे वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना वर्ल्ड कप ट्रॉफीची प्रतिक्षा आहे.

1 / 6
टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेला 1 जूनपासून सुरुवात होणार आहे.टीम इंडियाचे बहुतांश खेळाडू हे सध्या आयपीएलच्या 17 व्या मोसमात धमाकेदार कामगिरी करत आहेत. टीम इंडियाचे 3 फलंदाज हे प्रतिस्पर्धी संघांसाठी डोकेदुखी ठरु शकतात.

टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेला 1 जूनपासून सुरुवात होणार आहे.टीम इंडियाचे बहुतांश खेळाडू हे सध्या आयपीएलच्या 17 व्या मोसमात धमाकेदार कामगिरी करत आहेत. टीम इंडियाचे 3 फलंदाज हे प्रतिस्पर्धी संघांसाठी डोकेदुखी ठरु शकतात.

2 / 6
विराट कोहली, संजू सॅमसन आणि शिवम दुबे हे तिघे टी 20 वर्ल्ड कपमध्ये तडाखेदार बॅटिंग करु शकतात. संजूने 17 व्या हंगामात 11 सामन्यांमध्ये 5 अर्धशतकांसह 417 धावा केल्या आहेत.

विराट कोहली, संजू सॅमसन आणि शिवम दुबे हे तिघे टी 20 वर्ल्ड कपमध्ये तडाखेदार बॅटिंग करु शकतात. संजूने 17 व्या हंगामात 11 सामन्यांमध्ये 5 अर्धशतकांसह 417 धावा केल्या आहेत.

3 / 6
देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईसाठी आणि 17 व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्सकडून खेळत असलेला शिवम दुबे धमाका करु शकतो. शिवमने आतापर्यंत 11 सामन्यांमध्ये 3 अर्धशतकांसह 350 धावा केल्या आहेत.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईसाठी आणि 17 व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्सकडून खेळत असलेला शिवम दुबे धमाका करु शकतो. शिवमने आतापर्यंत 11 सामन्यांमध्ये 3 अर्धशतकांसह 350 धावा केल्या आहेत.

4 / 6
शिवम दुबे टीम इंडियासाठी फिनीशरची भूमिका बजावू शकतो. तसेच त्याच्याकडून 1-2 विकेट्सची अपेक्षा असणार आहे.

शिवम दुबे टीम इंडियासाठी फिनीशरची भूमिका बजावू शकतो. तसेच त्याच्याकडून 1-2 विकेट्सची अपेक्षा असणार आहे.

5 / 6
विराट कोहली झंझावाती बॅटिंग करण्यात माहिर आहेत. विराटने आतापर्यंत 17 व्या हंगामात सर्वाधिक धावा केल्या आहेत. विराटकडून वर्ल्ड कपमध्येही अशीच कामगिरी अपेक्षित असणार आहे.

विराट कोहली झंझावाती बॅटिंग करण्यात माहिर आहेत. विराटने आतापर्यंत 17 व्या हंगामात सर्वाधिक धावा केल्या आहेत. विराटकडून वर्ल्ड कपमध्येही अशीच कामगिरी अपेक्षित असणार आहे.

6 / 6
विराटने या हंगामात आतापर्यंत 12 सामन्यांमध्ये 634 धावा केल्या आहेत. विराटने या दरम्यान 5 अर्धशतकं आणि 1 शतक ठोकलं आहे.

विराटने या हंगामात आतापर्यंत 12 सामन्यांमध्ये 634 धावा केल्या आहेत. विराटने या दरम्यान 5 अर्धशतकं आणि 1 शतक ठोकलं आहे.