टीम इंडिया आयसीसी टी 20 वर्ल्ड कपनंतर आता झिंबाब्वे दौऱ्यात टी 20 मालिका खेळणार आहे. टीम इंडिया या झिंबाब्वे दौऱ्यासाठी रवाना झाली आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावर टीम इंडियाचे फोटो पोस्ट केले आहेत.
टीम इंडिया झिंबाब्वे विरुद्ध 5 टी सामने खेळणार आहे. या सीरिजसाठी टीम इंडियात युवा खेळाडूंना संधी दिली आहे.
झिंबाब्वे विरूद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियात बहुतांश युवा खेळाडू आहेत. टीम इंडियाचा कोच आणि कॅप्टनही नवा आहे. या मालिकेला 6 जुलै पासून सुरुवात होणार आहे.
शुबमन गिल टीम इंडियाचं या मालिकेत नेतृत्व करणार आहे. तर व्हीव्हीएस लक्ष्मण हेड कोच आहेत.
झिंबाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियात अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. आयपीएलच्या 17 व्या मोसमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.
टीम इंडियात तुषार देशपांडे, रियान पराग आणि अभिषेक शर्मा या नव्या दमाच्या खेळाडूंना संधी दिली आहे. या खेळाडूंच्या कामगिरीकडे साऱ्यांचंच लक्ष असणार आहे.