टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये दुसरा सेमी फायनल सामना गयाना येथे पार पडला. या सामन्यात टीम इंडियाने पहिल्यांदा बॅटींग करताना 20 ओव्हरमध्ये 171-7 धावा केलेल्या होत्या. यामध्ये रोहित शर्माने सर्वाधिक 57 धावा आणि सुर्यकुमार यादव याने 47 धावा केल्या होत्या.
टीम इंडिया वीस ते तीस धावा करण्यात कमी पडली की काय असं वाटत होतं. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजांना आपल्या आक्रमणासमोर गुडघे टेकायला भाग पाडल. इंग्लंडचा डाव 103 धावांवरच गुंडाळला गेला, यामध्ये अक्षर पटेल आणि कुलदीप यादवने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या.
सामना संपल्यावर बोलताना रोहितने आपल्या अर्धशतकी खेळीबद्दल न बोलता अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांच कौतुक केलं. धावसंख्या चांगली उभारली गेली होती पण अक्षर आणि कुलदीप यांनी दर्जेदार गोलंदाजी केली. मी त्यांना सामन्याआधी इतकंच सांगितलं होतं की, जास्तीत जास्त की स्टंपवर मारा करण्याचा प्रयत्न करा, असं रोहित म्हणाला.
आमच्यासाठी आम्ही शांत राहणे महत्त्वाचे आहे. कारण चांगले निर्णय घेण्यास मदत करते फायदेशीर ठरते. आम्ही घाबरलो नाही आणि तेच आमच्यासाठी महत्त्वाचे ठरल्याचं रोहित शर्मा म्हणला.
दरम्यान, टीम इंडियाचा आता फायनलमध्ये दक्षिण आफ्रिका संघासोबत 29 जूनला सामना होणार आहे. टीम इंडिया सामन्यासाठी तयार असून आता इतिहास रचण्यापासून भारताचे शिलेदार एक पाऊल दूर आहेत.