भारत पाकिस्तानकडून अनेक गोष्टींची खरेदी करतो, ज्यामध्ये खाद्यपदार्थांपासून ते कपड्यांपर्यंत अनेक गोष्टींचा समावेश आहे. भारत पाकिस्तानकडून सर्वाधिक प्रमाणात काळ्या मिठाची खरेदी करतो.
भारताचे अनेक देशांसोबत व्यापारी संबंध आहेत. भारत अनेक देशांसोबत आयात- निर्यात करतो. यामध्ये पाकिस्तानचा देखील समावेश आहे. जाणून घेऊयात भारत पाकिस्तानकडून कोणत्या गोष्टी खरेदी करतो.
भारत पाकिस्तानकडून अनेक गोष्टींची खरेदी करतो, दैनंदिन जीवनात लागणाऱ्या अनेक गोष्टींचा त्यामध्ये समावेश आहे. आपला देश जशी पाकिस्तानकडून काही गोष्टींची आयात करतो, तशाच काही गोष्टी निर्यात देखील करतो.
भारत पाकिस्तानकडून काळे मीठ, सुकामेवा, कातड्याचं सामान, सौंदर्य प्रसादने, मुल्तानी माती, सल्फर, तांबा, तांब्यापासून बनवलेल्या वस्तू, इत्याची खरेदी करतो.
या वस्तूंसोबतच भारत पाकिस्तानकडून विविध प्रकारची फळे, मिनरल इंधनं, प्लास्टिकचं सामान, लोकर, आणि चुना यांची देखील आयात करतो.
याशिवाय कापूस, चश्म्यासाठी आवश्यक असणारे विविध घटक, वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स देखील पाकिस्तानकडून खरेदी केले जातात.
स्टील आणि सिमेंट देखील आपण मोठ्या प्रमाणात पाकिस्तानकडून आयात करतो. त्यातून पाकिस्तानला मोठा फायदा होतो.