“पुण्यातील बंद बेकायदेशीर, उदयनराजेंना अटक करा”, गुणरत्न सदावर्ते यांची मागणी

| Updated on: Dec 13, 2022 | 1:49 PM

"उदयनराजे भोसले यांना अटक करा", अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.

पुण्यातील बंद बेकायदेशीर, उदयनराजेंना अटक करा, गुणरत्न सदावर्ते यांची मागणी
उदयनराजे भोसले
Image Credit source: tv 9
Follow us on

पुणे : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्यानंतर भगतसिंग कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून हटवण्याच्या मागणीने जोर धरला. आज पुण्यात बंद पाळण्यात आला आहे. डेक्कन ते लालमहाल असा मोर्चाही काढण्यात आला आहे. विविध सामाजिक संघटना या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत. यात भाजपचे खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसलेदेखील (Chhatrapati Udayanraje Bhonsle) सहभागी झाले आहेत. पण बेकायदेशीर असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पुण्यातील बंद आणि हा मोर्चा बेकायदेशीर असल्याचं म्हणत वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उदयनराजे भोसले यांच्या अटकेची मागणी केली आहे.

सर्वोच्च न्यायलयाने अनेकदा सांगितलं आहे की बंद बेकायदेशीर आहेत, असं असताना आज हा बंद पुकारण्यात आलाय. कष्टकऱ्यांच्या पोटावर पाय देण्याचं काम सुरू आहे. हा बंद बेकायदेशीर आहे. त्यामुळे उदयनराजेंना अटक करण्यात यावी, असं सदावर्ते म्हणालेत.

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात नितीन गडकरी आणि शरद पवार यांना डी.लिट पदवी प्रदान करण्यात आली तेव्हा बोलताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी औरंगाबादमध्ये बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची तुलना थेट शिवरायांशी केली होती.

कोश्यारी यांचं वादग्रस्त वक्तव्य

तुम्हा तरूण मुलांना जर कुणी विचारलं तुमचा आयकॉन कोण? तुमचा आवडता नेता कोण? तर तुम्हाला बाहेर जायची गरज नाही. महाराष्ट्रातच तुम्हाला भेटून जातील. शिवाजी महाराज तर जुन्या काळातील आहेत. मी आधुनिक काळाबाबत बोलत आहे. इथेच मिळतील. डॉ. आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला सर्व इथेच मिळून जातील, असं वादग्रस्त वक्तव्य भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे.