मुंबई : जाणूनबुजून किंवा नकळत, आपण अनेकदा अशा चुका करतो ज्याचा आपल्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम तर होतोच पण आर्थिक संकट अधिक गडद होत जाते. यापैकी एक सवय म्हणजे बसताना किंवा झोपताना पाय विनाकारण हलवणे . आई लक्ष्मीला ही सवय आवडत नाही. अनेकदा घरातील वडीलधारी मंडळीही पाय हलवत असतना टोकतात, मात्र नविन पिढी त्यांच्याकडे दुर्लक्ष करते. आज आम्ही तुम्हाला तुमच्या पाय हलवण्याच्या सवयीबद्दल काही खास माहिती सांगत आहोत, ज्या वाचल्यानंतर तुम्ही याबद्दल नक्की विचार कराल. जाणून घेऊया वास्तूशास्त्र (Vastu Tips) याबद्दल काय सांगतं?
आपले पाय हलवण्याची वाईट सवय थेट आपल्या आरोग्याशी आणि संपत्तीशी संबंधित आहे. शास्त्रानुसार उंच ठिकाणी खाट, खुर्ची, पलंग इत्यादींवर बसून किंवा झोपताना पाय हलवल्याने कुंडलीतील चंद्र कमजोर होतो. चंद्र हा मनाचा कारक आहे. अशा स्थितीत चंद्राच्या अशुभ प्रभावामुळे व्यक्तीला मानसिक तणावाचा सामना करावा लागतो. त्याची निर्णय घेण्याची क्षमता कमी होऊ लागते.
पाय अनावश्यकपणे हलवण्यामुळे व्यक्तीच्या आरोग्यावर चंद्राचा दुष्परिणाम होतो. त्याला रोज कोणत्या ना कोणत्या आजाराने ग्रासावे लागते. इतकेच नाही तर या सवयीमुळे देवी लक्ष्मी कोपते आणि व्यक्ती आर्थिक विवंचनेने त्रस्त राहतो. पैशांचा खर्च वाढू लागतो. कर्ज फेडण्यात अडचणी येऊ लागतात. घरात ओलसरपणा पसरतो.
बसताना पाय थरथरल्याने एकाग्रता होत नाही. अशा स्थितीत पूजेच्या वेळी पाय हलवणाऱ्याची प्रार्थना व उपवास व्यर्थ ठरतात. विचलित झाल्यामुळे, तो देवाच्या उपासनेवर एकाग्रतेने लक्ष केंद्रित करू शकत नाही आणि चुका करतो. याचा शारीरिक सुख आणि शांतीवर अशुभ परिणाम होतो.
पाय हलवणे ज्योतिषशास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून योग्य मानले जात नाही. वैद्यकशास्त्रात पाय हलवण्याच्या सवयीचे वर्णन रेस्टलेस लेग्स सिंड्रोम असे केले आहे आणि हा एक गंभीर आजार आहे. या आजारामुळे हृदय, किडनी आणि पार्किन्सन्सशी संबंधित समस्या वाढतात. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की पाय हलवण्याची सवय ही व्यक्तीच्या शरीरात लोहाची कमतरता असल्याचे सूचित करते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)