Rahu Dosh : पत्रिकेतील राहू दोषामुळे करावा लागतो समस्यांचा सामना, या सोप्या उपायांनी मिळेल लाभ

| Updated on: Jun 16, 2023 | 9:47 PM

वैदिक ज्योतिषशास्त्रात एकूण 9 ग्रह सांगण्यात आले आहेत, ज्यामध्ये राहू-केतू (Rahu Nakshatra Transit 2022) हे छाया किंवा वायू ग्रह मानले जातात. हे दोन्ही ग्रह अशुभ ग्रहांच्या यादीत येतात.

Rahu Dosh : पत्रिकेतील राहू दोषामुळे करावा लागतो समस्यांचा सामना, या सोप्या उपायांनी मिळेल लाभ
राहू दोष
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : राहूला ज्योतिषशास्त्रात अत्यंत क्रूर ग्रह मानले गेले असून तो सावलीचा ग्रह आहे. ज्याच्या कुंडलीवर राहूची सावलीही असते, त्याचे वाईट दिवस सुरू होतात. कामात अडथळे येतात. कुंडलीत राहू दोष (Rahu Dosh Upay) असल्यास व्यक्तीच्या जीवनात अशुभ घटना घडू लागतात. भितीदायक पडतात आणि शरीरात अशक्तपणा आणि सुस्ती जाणवते. राहूचा अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी आम्ही तुम्हाला काही खास उपाय सांगत आहोत ज्याचा तुम्हाला फायदा होईल.

सोमवार आणि शनिवारी करा हा उपाय

कुंडलीतील राहूची अशुभ स्थिती दूर करण्यासाठी प्रत्येक सोमवार आणि शनिवारी शिवलिंगाला जल अर्पण करावे आणि काळे तीळ अर्पण करावेत. सकाळी स्नान केल्यावर ओम रा रहावे नमः मंत्राचा 108 वेळा जप करावा. असे करणे तुमच्यासाठी खूप शुभ, फलदायी आणि परिणामकारक मानले जाते. हा उपाय केल्याने भगवान शंकराचा आशीर्वादही प्राप्त होतो.

बुधवारी हा उपाय करा

राहू कुंडलीत अशुभ असेल तर बुधवारपासून सात दिवस काळ्या कुत्र्याला गोड भाकरी खाऊ घातल्यास राहूच्या दोषापासून मुक्ती मिळते आणि अशुभ स्थिती संपते. असे मानले जाते की ज्यांना राहूच्या दोषाने त्रास होतो त्यांनी खऱ्या मनाने शंकराची पूजा करावी. शिवाच्या कृपेने राहु दोष दूर होतो.

हे सुद्धा वाचा

या रंगाचे कपडे परिधान करा

राहूच्या दोषाने त्रासलेल्या लोकांनी अधिकाधिक निळे कपडे घालावेत. अशा लोकांनी मद्य आणि मांस पूर्णपणे सोडून द्यावे. राहूच्या दोषाने त्रस्त असलेल्या लोकांनी अधिकाधिक सत्याचे पालन करावे. राहूच्या दोषात शिवसाहित्य, शिवपुराण इत्यादींचे पठण केल्याने विशेष लाभ होतो.

शनिवारी करा हा उपाय

शनिवारी तांब्याच्या भांड्यात पाणी आणि दुर्वा ठेवा. आंघोळ केल्यानंतर हे पाणी पिंपळाच्या झाडाच्या मुळास अर्पण करावे. असे केल्याने राहू दोष संपतो. हा उपाय सात शनिवारी केल्याने विशेष लाभ होतो.

शनिवारी या गोष्टींचे सेवन करा

शनिवारी काळ्या तिळापासून बनवलेल्या वस्तूंचे जास्तीत जास्त सेवन करावे. काळ्या तिळापासून बनवलेले लाडू, गोड पोळी, गोड चुरमा या पैकी एका पदार्थाचे सेवन करा. असे केल्याने राहु दोष दूर होतो आणि शनिदोषासाठीही हा उपाय प्रभावी आहे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)