अयोध्येच्या माध्यमातून वाहाणार समृद्धीची गंगा, मक्का आणि वेटीकन सिटीपेक्षा जास्त उलाढाल होण्याची शक्यता

| Updated on: Jan 25, 2024 | 10:06 AM

अहवालानुसार, दरवर्षी सुमारे पाच कोटी भाविक अयोध्येला भेट देतील अशी अपेक्षा आहे, ज्यामुळे ते केवळ उत्तर प्रदेशच नाही तर संपूर्ण देशाचे प्रमुख पर्यटन स्थळ बनले आहे. ही गोष्ट किती मोठी आहे याचा अंदाज या मोजक्या आकडेवारीवरून तुम्ही लावू शकता. आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिर दरवर्षी 2.5 कोटी भाविकांना आकर्षित करते आणि वार्षिक 1,200 कोटी रुपयांची कमाई करते.

अयोध्येच्या माध्यमातून वाहाणार समृद्धीची गंगा, मक्का आणि वेटीकन सिटीपेक्षा जास्त उलाढाल होण्याची शक्यता
अयोध्या
Image Credit source: Social Media
Follow us on

अयोध्या : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयाने एसबीआय रिसर्चच्या अहवालाचा हवाला देत दावा केला आहे की आगामी आर्थिक वर्षात राज्याला कर महसूल म्हणून 25 हजार कोटी मिळण्याची अपेक्षा आहे. एका वृत्तसंस्थेने सरकारी विधानाचा हवाला देत म्हटले आहे की, उत्तरप्रदेश यावर्षी अंदाजे 4 लाख कोटी रुपये अधिक कमवेल. यात अयोध्या हा सर्वात महत्त्वाचा घटक असेल हे स्पष्ट आहे कारण येथे केवळ देशातूनच नव्हे तर परदेशातूनही पर्यटक आणि भाविक हजेरी लावतील. विदेशी शेअर मार्केट रिसर्च फर्म जेफरीजच्या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, अयोध्या भाविकांच्या संख्येच्या बाबतीत व्हॅटिकन सिटी आणि मक्का यांना मागे टाकेल. राम मंदिराच्या (Ram Mandir Turnover) उभारणीमुळे आंतरराष्ट्रीय विमानतळ, आधुनिक रेल्वे स्थानक, नवीन हॉटेल्स, रस्ते जोडणी आणि इतर अनेक सुविधा त्याभोवती विकसित होत आहेत.

5 कोटींहून अधिक भाविकांचे आगमन होण्याचा अंदाज

अहवालानुसार, दरवर्षी सुमारे पाच कोटी भाविक अयोध्येला भेट देतील अशी अपेक्षा आहे, ज्यामुळे ते केवळ उत्तर प्रदेशच नाही तर संपूर्ण देशाचे प्रमुख पर्यटन स्थळ बनले आहे. ही गोष्ट किती मोठी आहे याचा अंदाज या मोजक्या आकडेवारीवरून तुम्ही लावू शकता. आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिर दरवर्षी 2.5 कोटी भाविकांना आकर्षित करते आणि वार्षिक 1,200 कोटी रुपयांची कमाई करते. दरवर्षी 80 लाख लोक वैष्णोदेवीला भेट देतात आणि त्यातून वर्षाला 500 कोटी रुपयांचा महसूल मिळतो. आग्रा येथील ताजमहाल 70 लाख अभ्यागतांना आकर्षित करतो, 100 कोटींची वार्षिक कमाई करतो, तर आग्रा किल्ला 30 लाख पर्यटकांना आकर्षित करतो, ज्यामुळे वार्षिक उत्पन्न 27.5 कोटी होते.

हे सुद्धा वाचा

5 कोटींपेक्षा जास्त असण्याचा अंदाज आहे

सरकारने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दुसऱ्या अंदाजानुसार, भगवान श्रीरामाच्या दर्शनासाठी दररोज एक लाखाहून अधिक भाविक अयोध्येत येण्याची अपेक्षा आहे. ही संख्या लवकरच दररोज तीन लाख भाविकांपर्यंत पोहोचू शकते. असे झाल्यास वर्षाला 10 कोटींहून अधिक भाविक अयोध्येत येऊ शकतात. प्रत्येक भक्ताने त्याच्या भेटीदरम्यान सुमारे ₹ 2500 खर्च केले तर एकट्या अयोध्येची स्थानिक अर्थव्यवस्था  25,000 कोटींनी वाढेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.