Diwali 2023 : कधी साजरी केली होती पहिली दिवाळी, या पाच पौराणिक कथेत दडले आहे रहस्य

| Updated on: Oct 18, 2024 | 1:32 PM

Diwali 2023 दिवाळी म्हणजे रोषणाई, फराळ, धम्माल, स्वच्छता, रांगोळी आणि दिव्यांच्या सण. आपण कधी विचार केला आहे का की आपण हा सुंदर सण का साजरे करतो? हा पवित्र सण कधी सुरू झाला याचा विचार केला आहे का? त्याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया. दिवाळी दोन शब्दांपासून बनलेली आहे. दीप आणि अवली म्हणजे दिव्यांची रांग किंवा ओळ. त्यामुळे या सणाला दिवे लावले लावले जातात.

1 / 5
राम अयोध्येला परतले- लंकेचा राजा रावणाचा वध करून जेव्हा भगवान श्रीराम आपली पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासह अयोध्येत परतले तेव्हा संपूर्ण अयोध्या नगरी दिव्यांनी उजळून निघाली होती, असे रामायणात सांगितले आहे. 14 वर्षांच्या वनवासानंतर भगवान राम अयोध्येत आल्यावर दिवाळी साजरी करण्यात आली. प्रत्येक शहरात आणि गावात दिवे लावले गेले. तेव्हापासून दिवाळीचा हा सण अंधारावर विजयाचा सण बनला आणि दरवर्षी साजरा केला जाऊ लागला.

राम अयोध्येला परतले- लंकेचा राजा रावणाचा वध करून जेव्हा भगवान श्रीराम आपली पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासह अयोध्येत परतले तेव्हा संपूर्ण अयोध्या नगरी दिव्यांनी उजळून निघाली होती, असे रामायणात सांगितले आहे. 14 वर्षांच्या वनवासानंतर भगवान राम अयोध्येत आल्यावर दिवाळी साजरी करण्यात आली. प्रत्येक शहरात आणि गावात दिवे लावले गेले. तेव्हापासून दिवाळीचा हा सण अंधारावर विजयाचा सण बनला आणि दरवर्षी साजरा केला जाऊ लागला.

2 / 5
जेव्हा धन्वंतरी प्रकट झाले- पौराणिक मान्यतेनुसार सतयुगात पहिली दिवाळी साजरी केली जात असे. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला म्हणजेच धनत्रयोदशीला देवांचे वैद्य धन्वंतरी समुद्रमंथनातून अमृत पात्रासह प्रकट झाले. धन्वंतरी प्रकट झाल्यामुळे धनत्रयोदशी साजरी होऊ लागली. त्यांच्या नंतर, संपत्तीची देवी लक्ष्मी प्रकट झाली आणि दिव्यांच्या उत्सवाने त्यांचे स्वागत झाले.

जेव्हा धन्वंतरी प्रकट झाले- पौराणिक मान्यतेनुसार सतयुगात पहिली दिवाळी साजरी केली जात असे. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला म्हणजेच धनत्रयोदशीला देवांचे वैद्य धन्वंतरी समुद्रमंथनातून अमृत पात्रासह प्रकट झाले. धन्वंतरी प्रकट झाल्यामुळे धनत्रयोदशी साजरी होऊ लागली. त्यांच्या नंतर, संपत्तीची देवी लक्ष्मी प्रकट झाली आणि दिव्यांच्या उत्सवाने त्यांचे स्वागत झाले.

3 / 5
पांडव घरी परतले- दिवाळीत पांडवांच्या घरी परतल्याबद्दलही एक कथा आहे. पांडवांनाही वनवास भोगावा लागला होता, त्यानंतर पांडव घरी परतले आणि या आनंदात संपूर्ण शहर उजळून निघाले आणि तेव्हापासून दिवाळी सुरू झाली.

पांडव घरी परतले- दिवाळीत पांडवांच्या घरी परतल्याबद्दलही एक कथा आहे. पांडवांनाही वनवास भोगावा लागला होता, त्यानंतर पांडव घरी परतले आणि या आनंदात संपूर्ण शहर उजळून निघाले आणि तेव्हापासून दिवाळी सुरू झाली.

4 / 5
श्रीकृष्णाच्या हातून नरकासुराचा वध- भगवान श्रीकृष्णाने आपली पत्नी सत्यभामा हिच्या मदतीने नरकासुराचा वध केला होता. नरका सूरला एका स्त्रीच्या हातून मारल्याचा शाप होता. त्या दिवशी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी होती. नरका सूरच्या दहशतीतून व अत्याचारापासून मुक्ती मिळाल्याच्या आनंदात लोकांनी दीपोत्सव साजरा केला. दुसऱ्या दिवशी दिवाळी साजरी झाली.

श्रीकृष्णाच्या हातून नरकासुराचा वध- भगवान श्रीकृष्णाने आपली पत्नी सत्यभामा हिच्या मदतीने नरकासुराचा वध केला होता. नरका सूरला एका स्त्रीच्या हातून मारल्याचा शाप होता. त्या दिवशी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी होती. नरका सूरच्या दहशतीतून व अत्याचारापासून मुक्ती मिळाल्याच्या आनंदात लोकांनी दीपोत्सव साजरा केला. दुसऱ्या दिवशी दिवाळी साजरी झाली.

5 / 5
लक्ष्मी गणेशाची पूजा- तसे, दिवाळीच्या दिवशी आपण गणपती आणि आई लक्ष्मीची एकत्र पूजा करतो आणि समृद्धीसाठी प्रार्थना करतो. कारण श्रीगणेश ही बुद्धीची देवता आहे आणि माता लक्ष्मी ही संपत्तीची देवी आहे.

लक्ष्मी गणेशाची पूजा- तसे, दिवाळीच्या दिवशी आपण गणपती आणि आई लक्ष्मीची एकत्र पूजा करतो आणि समृद्धीसाठी प्रार्थना करतो. कारण श्रीगणेश ही बुद्धीची देवता आहे आणि माता लक्ष्मी ही संपत्तीची देवी आहे.