Pitru Paksha 2023 : आजपासून पितृपक्षाला सुरूवात, जाणून घ्या श्राद्ध तिथी, पुजा विधी आणि महत्त्व

| Updated on: Sep 29, 2023 | 10:14 AM

असे मानले जाते की श्राद्ध पक्षाच्या वेळी आपले पूर्वज सूक्ष्म स्वरूपात पृथ्वीवर येतात आणि त्यांच्या नावाने केलेला प्रसाद स्वीकारतात. यामुळे पितरांच्या आत्म्याला शांती मिळते आणि घरात सुख-शांती राहते. पितृ पक्ष भाद्रपदाच्या पौर्णिमेच्या दिवसापासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या अमावास्येपर्यंत चालू असतो.

Pitru Paksha 2023 : आजपासून पितृपक्षाला सुरूवात, जाणून घ्या श्राद्ध तिथी, पुजा विधी आणि महत्त्व
पितृपक्ष
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : वर्षातील पंधरा दिवसांच्या विशेष कालावधीत श्राद्ध विधी केले जातात आणि आजपासून त्याची सुरुवात झाली आहे. श्राद्ध पक्षाला (Pitru Paksha 2023) पितृपक्ष आणि महालय असेही म्हणतात. श्राद्धाच्या वेळी, कुटुंबातील देवता, पूर्वज आणि पितरांबद्दल आदर व्यक्त केला जातो. असे मानले जाते की श्राद्ध पक्षाच्या वेळी आपले पूर्वज सूक्ष्म स्वरूपात पृथ्वीवर येतात आणि त्यांच्या नावाने केलेला प्रसाद स्वीकारतात. यामुळे पितरांच्या आत्म्याला शांती मिळते आणि घरात सुख-शांती राहते. पितृ पक्ष भाद्रपदाच्या पौर्णिमेच्या दिवसापासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या अमावास्येपर्यंत चालू असतो. अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षाला पितृपक्ष म्हणतात. भाद्रपद पौर्णिमेला, वर्षातील कोणत्याही पौर्णिमेच्या दिवशी मृत्यू झालेल्यांचे श्राद्ध केले जाते. अश्विन अमावस्येला भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी देह सोडणाऱ्यांचे तर्पण करण्याचा सल्ला शास्त्रात दिला आहे. वर्षाच्या कोणत्याही पक्षात, ज्या तिथीला कुटुंबातील पूर्वजांचा मृत्यू झाला असेल, त्याच तिथीला पितृपक्षात श्राद्ध करावे.

पितृ पक्ष 2023 तिथी

29 सप्टेंबर म्हणजेच आजपासून पितृ पक्ष सुरू झाला आहे. तिची प्रतिपदा तिथी आज दुपारी 3:26 ते 30 सप्टेंबरपर्यंत म्हणजेच उद्या दुपारी 12:21 पर्यंत असेल.
पितृ पक्षाचा कुतुप मुहूर्त 29 सप्टेंबर रोजी म्हणजेच आज रात्री 11:47 ते 12:35 पर्यंत असेल. तसेच रोहीण मुहूर्त आज दुपारी 12:35 ते 1:23 पर्यंत असेल. आज दुपारची वेळ दुपारी 1:23 ते 3:46 पर्यंत असेल.

पितृपक्षात पितरांचे स्मरण कसे करावे?

पितृ पक्षामध्ये आपण आपल्या पितरांना नियमित जल अर्पण केले पाहिजे. हे तर्पण दुपारी दक्षिण दिशेला तोंड करून दिले जाते. काळे तीळ पाण्यात मिसळून ते पाणी भाताच्या पिंडावर सोडतात. पूर्वजांच्या मृत्यूच्या दिवशी अन्न आणि वस्त्रांचे दान केले जाते. त्याच दिवशी गरीब व्यक्तीला अन्न धान्य दिले जाते. यानंतर पितृ पक्षाचे कार्य संपते.

हे सुद्धा वाचा

पितृ पक्षात हे उपाय करा

पितृ पक्षाच्या काळात तुमच्या घरी कोणताही प्राणी किंवा पक्षी आला तर त्याला खायला द्यावे. असे मानले जाते की पूर्वज आपल्याला या रूपांमध्ये भेटायला येतात. पितृपक्षात ताटात भोजन केले आणि ब्राह्मणांना ताटात भोजन अर्पण केले तर ते फलदायी ठरते.

श्राद्ध करणाऱ्या सदस्याने या दिवसांत केस व नखे कापू नयेत. त्यांनीही ब्रह्मचर्य पाळावे. श्राद्ध विधी नेहमी दिवसा करा. सूर्यास्तानंतर श्राद्ध करणे अशुभ मानले जाते. या दिवसात काकडी, हरभरा, जिरे आणि मोहरी या भाज्या खाऊ नयेत. प्राणी किंवा पक्ष्यांना त्रास देऊ नका.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)