Ram Mandir : 70 वर्षांपासून रामाला दाखवला जातोय या दुकानातील रबडीचा नैवैद्य, कोण आहेत हे सीताराम यादव?

| Updated on: Jan 17, 2024 | 3:15 PM

सीताराम यांच्या म्हणण्यानुसार, ते त्यांच्या वडिलांसोबत रामललाला अर्पण करण्यासाठी दुकानात बताशा बनवत असे. वडिलांचे 20 वर्षांपूर्वी निधन झाले. यानंतर ते स्वत: श्री रामासाठी प्रसाद बनवू लागले. एवढेच नाही तर त्यांनी श्री रामजन्मभूमी खटल्यात साक्षीदार म्हणून साक्ष दिली.

Ram Mandir : 70 वर्षांपासून रामाला दाखवला जातोय या दुकानातील रबडीचा नैवैद्य, कोण आहेत हे सीताराम यादव?
सीताराम, अयोध्या
Image Credit source: Social Media
Follow us on

प्रदीप कापसे, अयोध्या :  22 जानेवारीला श्री रामाच्या प्राणप्रतिष्ठापणेचा विधी पार पडणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अयोध्येचे सीताराम यादव यांचा परिवार गेल्या 70 वर्षांपासून श्री रामासाठी (Shri Ram) नैवेद्य बनवत आहेत. सीताराम यादव यांचे अयोध्येत वडीलोपार्जीत मिठाईचे दुकान आहे. सुरवातीला अयोध्येतील ते एकमेव मिठाईचे दुकान होते जिथून देवाला नैवेद्यासाठी मिष्ठांन्न पाठवले जात होते.   आजही श्री रामललाला नैवेद्यासाठी त्यांच्या दुकानातून 5 किलो रबडी आणि पेढे पाढवले जातात.

यापूर्वी रामलाला नैवेद्य दाखवण्यासाठी बताशा बनवला जात होता

सीताराम यांच्या म्हणण्यानुसार, ते त्यांच्या वडिलांसोबत रामललाला अर्पण करण्यासाठी दुकानात बताशा बनवत असे. वडिलांचे 20 वर्षांपूर्वी निधन झाले. यानंतर ते स्वत: श्री रामासाठी प्रसाद बनवू लागले. एवढेच नाही तर त्यांनी श्री रामजन्मभूमी खटल्यात साक्षीदार म्हणून साक्ष दिली. छोट्या-छोट्या ठिकाणांपासून ते मोठ्या मंदिरांपर्यंत आज श्रीरामाला स्वतःच्या हातांनी बनवलेला नैवेद्य दाखवला जातो. वादात त्यांना त्यांचे दुकानही गमवावे लागले होते.

यावेळी त्यांचे दुकान व जमीन सर्वच नष्ट झाले. सरकारला त्यांना भरपाई द्यायची होती, पण ती न घेता सर्व काही श्रीरामाच्या नावावर दिले. आजही त्याचे काही अंतरावर दुसरे दुकान आहे.

हे सुद्धा वाचा

सरकारी वाहनांमध्ये साक्ष देण्यासाठी जात असे

मुलगी श्याम यादवच्या म्हणण्यानुसार, आमचे बाबा श्रीरामासाठी नैवेद्य बनवायचे आणि आता त्या स्वतःदेखील ही सेवा देत आहेत. जमीन विवाद सुरू असताना त्यांचे वडील श्री रामजन्मभूमी प्रकरणात साक्ष देण्यासाठी जात असतं. त्यांना शासकीय वाहनातून नेण्यात येत असे. मात्र आता मंदिर उभारले जात असताना त्यांना आमंत्रण न देण्यात आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.

राम मंदिरातील रामललाच्या मूर्तीच्या अभिषेकपूर्वी अयोध्या परिवाराच्या वेदना व्यक्त झाल्या आहेत. सीताराम म्हणतात की, आम्ही 1950 पासून आमच्या वडिलांसोबत श्री रामललाचा प्रसाद बनवत आहोत. आजही प्रभू श्री रामाला अर्पण करण्यासाठी दुकानातून दररोज रबरी-पेढा घेतला जातो. रामजन्मभूमी खटल्यात वडीलही साक्षीदार होते. पण अभिषेकासाठी निमंत्रण दिले गेले नाही. मात्र, आमंत्रण मिळाले तर ठीक, नाही मिळाले तर ठीक, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. आम्ही श्री रामजींच्या सेवेत तत्पर राहू असेही ते म्हणाले.