आयसीसी टी-20 वर्ल्ड कपच्या सुपर-8 मधील ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश झाला. बांगलादेशचा या सामन्यामध्ये कांगारूंनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशने 20 ओव्हरमध्ये 140-8 धावा केल्या. या सामन्यातच पॅट कमिन्सने वर्ल्ड कपध्ये पहिली हॅट्रिक घेण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. हा सामना ऑस्ट्रेलियन संघाने बांगलादेशच्या धावांचा पाठलाग करताना 100 धावा केल्या तरीपण कसाकाय जिंकला? असा प्रश्न अनेकांना पडला. कांगारूंनी टार्गेट न करताही या सामन्याचा निकाल त्यांच्या बाजूने कसा काय लागला समजून घ्या.
बांगलादेशने 20 ओव्हर 8 गडी गमावून 140 धावा केल्या. ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 141 धावांचे लक्ष्य ठेवलं होतं. कर्णधार नजमुल शांतोने 41 तर तौहीद हृदयने 40 धावा केल्या. ऑस्ट्रेलिया बॅटींगला उतरल्यावर पावसाने हजेरी लावली. 6.2 ओव्हरमध्ये पहिल्यांदा पाऊस पडला, त्यावेळी ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 64/0 होती आणि डकवर्थ लुईस पद्धतीनुसार त्यांची धावसंख्या 35/0 असायला हवी होती. ऑस्ट्रेलियाने 11.2 ओव्हरमध्ये 2 बाद 100 धावा केल्या होत्या. तर डकवर्थ लुईस पद्धतीनुसार ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 2 विकेट जात 72 धावा असती तर विजय त्यांच्या बाजूनेच लागला असता.
सुपर-8 गट-1 च्या पॉइंट टेबलमध्ये ऑस्ट्रेलियाचा रनरेट भारतापेक्षा चांगला आहे. त्यामुळे रनरेट आधारावर दोन गुणांसह अव्वल स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा नेट रन रेट +2.471 आहे, तर भारताचा निव्वळ रन रेट +2.350 आहे. भारताने पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव केला असून ऑस्ट्रेलियाने बांगलादेशचा पराभव केला. ऑस्ट्रेलियाला आपला पुढचा सामना अफगाणिस्तानविरुद्ध खेळायचा आहे आणि भारताला आपला पुढचा सुपर-8 सामना बांगलादेशविरुद्ध खेळायचा आहे.
बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): तनझिद हसन, लिटन दास (WK), नजमुल हुसेन शांतो (C), शकीब अल हसन, तौहिद ह्रदोय, महमुदुल्ला, महेदी हसन, रिशाद हुसैन, तस्किन अहमद, तनझिम हसन साकिब, मुस्तफिजुर रहमान
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श (C), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (WK), पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, ॲडम झाम्पा, जोश हेझलवूड