आऊट ऑफ फॉर्म असलेल्या विराट कोहलीबाबत गौतम गंभीरचं मोठं वक्तव्य, म्हणाला…

| Updated on: Oct 14, 2024 | 6:21 PM

विराट कोहलीची बॅट कसोटी क्रिकेटमध्ये अजूनही शांत आहे. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यातही काही खास करू शकला नाही. आता न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. सध्या आऊट ऑफ फॉर्म असलेल्या विराट कोहलीबाबत गौतम गंभीरने मोठं वक्तव्य केलं आहे.

आऊट ऑफ फॉर्म असलेल्या विराट कोहलीबाबत गौतम गंभीरचं मोठं वक्तव्य, म्हणाला...
Image Credit source: PTI
Follow us on

भारताने बांगलादेशविरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका 2-0 ने खिशात घातली. दुसऱ्या कसोटी सामन्यात पावसामुळे अडीच दिवसांचा खंड पडला होता. मात्र शेवटच्या दोन दिवसात बांगलादेशला पराभवाचं पाणी पाजत मालिका 2-0 ने जिंकली. या मालिकेत टीम इंडियाने बाजी मारली असली तर विराट कोहलीचा फॉर्म चिंतेचा विषय ठरला आहे. विराट कोहलीने दोन कसोटी सामन्यातील 4 डावात फक्त 99 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे कसोटीत विराटो कोहलीचं या वर्षात एकही अर्धशतक आलेलं नाही. त्यामुळे टीम इंडियाच्या गोटात त्याच्या फॉर्मबाबत चिंता आहे. आता 16 ऑक्टोबरपासून न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरु होत आहे. यासाठी विराट कोहली नुकताच लंडनहून परतला आहे. तसेच सराव शिबिरात भाग घेतल्याची माहिती आहे. असं असताना टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने विराट कोहलीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. विराट कोहलीमध्ये अजूनही धावांची भूक आहे आणि तो न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाची ताकद असेल, अस वक्तव्य गौतम गंभीरने केलं आहे.

पीटीआयच्या वृत्तानुसार गौतम गंभीरने सांगितलं की, “विराट कोहलीमध्ये अजूनही धावांची भूक आहे. आशा आहे की, न्यूझीलंड आणि नंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगल्या धावा करेल. एकदा का त्याने लय पकडली तर धावांच्या बाबतीत सातत्यपूर्ण कामगिरी करतो, हे आपण पाहिलं आहे.” विराट कोहलीची कसोटीत बॅट शांत असली तरी सर्वात वेगाने 27 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. दरम्यान, गौतम गंभीरने आक्रमक क्रिकेटबाबत टीम इंडियाचं समर्थन केलं. तसेच असाच खेळ भविष्यात पाहायला मिळेल असंही सांगितलं.

प्रशिक्षक गौतम गंभीरने सांगितलं की, ‘भारतीय संघ 100 धावांवर ऑलआउट झाला तरी चालेल, पण आम्ही आक्रमक क्रिकेट खेळणं सोडणार नाही. पण दबाव घेणार नाही. अशा स्थितीतही आम्ही पाय रोवून सामना करू.’ बांगलादेशविरुद्ध भारताच्या या रणनितीचा अंदाच आला आहे. भारताने पहिल्यांदा आक्रमक फलंदाजी केली. मग गोलंदाजीत चांगलं प्रदर्शन करत सामना दोन दिवसात संपवला. या कसोटीत भारताने जलद 100, 150, 200 आणि 250 धावांचा रेकॉर्ड केला होता.