मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये तिसरा सामना आज संध्याकाळी (28 नोव्हेंबर) पार पडणार आहे. या सामन्याआधी ऑस्ट्रेलिया संघाने आपल्या टीममध्ये मोठा बदल केला आहे. गुवाहाटीमध्ये हा सामना पार पडणार असून कांगारूंसाठी करो मरो असा सामना आहे. कारण पाच सामन्यांमधील पहिल्या दोन सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलिया संघाचा पराभव झाला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात विजय मिळवण गरजेचं आहे नाहीतर मालिका हातातून जाणार आहे. आजच्या सामन्यासाठी ड्रीम 11 लावत असाल तर पूढे दिलेली टीम तुम्हाला मदत करू शकते.
भारतीय संघामध्ये कोणताही बदल झालेला दिसणार नाही, कारण पहिल्या सामन्यातील विजयी संघ खेळवण्यावर सूर्यकुमार यादव भर देईल. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलिया संघातील सहा खेळाडू माघारी परतले आहेत. वर्ल्ड कपपासून हे खेळाडू भारतामध्येच होते. येणाऱ्या कसोटी मालिकेआधी आराम मिळावा म्हणून त्यांना पाठवलं आहे. स्टीव्ह स्मिथ आणि ग्लेन मॅक्सवेल, अॅडम झाम्पा, मार्कस स्टॉइनिस, जोश इंग्लिस आणि सीन अॅबॉट हे खेळाडी माघारी परतले आहेत.
कर्णधार- यशस्वी जयस्वाल
उपकर्णधार- जोश इंग्लिस
यष्टिरक्षक- इशान किशन
अष्टपैलू- अक्षर पटेल, मार्क स्टॉइनिस
फलंदाज- सूर्य कुमार यादव, टिम डेव्हिड, ऋतुराज गायकवाड
गोलंदाज- रवी विश्नोई, शॉन अॅबॉट, मुकेश कुमार
मॅथ्यू वेड (C), जेसन बेहरेनडॉर्फ, टिम डेव्हिड, बेन ड्वार्शुइस, नॅथन एलिस, ख्रिस ग्रीन, आरोन हार्डी, ट्रॅव्हिस हेड, बेन मॅकडरमॉट, जोश फिलिप, तन्वीर संघा, मॅट शॉर्ट, केन रिचर्डसन
टी20 मालिकेसाठी टीम इंडिया | सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा, आवेश खान आणि मुकेश कुमार.