RCB vs GT Weather Report | आरसीबीसाठी वाईट बातमी, पावसामुळे प्लेऑफचं स्वप्न भंगणार?

| Updated on: May 21, 2023 | 4:31 PM

आयपीएल 2023 च्या प्लेऑफचं एका जागेसाठीचं समीकरण हे साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यानंतर स्पष्ट होणार आहे. मात्र या जागेसाठी आरसीबी आणि मुंबई या दोघांमध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे.

RCB vs GT Weather Report | आरसीबीसाठी वाईट बातमी, पावसामुळे प्लेऑफचं स्वप्न भंगणार?
Follow us on

बंगळुरु | आयपीएल 16 व्या मोसमात रविवारी 21 मे रोजी साखळी फेरीतील शेवटचं डबल हेडर आयोजित करण्यात आलं आहे. या डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद आमनेसामने आहेत. तर दुसऱ्या मॅचमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध गुजरात टायटन्स भिडणार आहेत. प्लेऑफसाठी गुजरात, चेन्नई आणि लखनऊ या तिन्ही संघांनी क्रमाने प्रवेश केला आहे. तर आता अवघ्या एका जागेसाठी मुंबई, आरसीबी आणि राजस्थान हे तिन्ही संघांमध्ये चढाओढ आहे. आता हा तिसरा संघ कोणता असेल, हे या डबल हेडरनंतर स्पष्ट होईल. मात्र त्याआधी आरसीबीसाठी वाईट बातमी समोर आली आहे.

आरसीबी विरुद्ध जीटी यांच्यात मोसमातील साखळी फेरीमधील अखेरचा सामना असणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. सामन्याचं आयोजन हे एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. आरसीबीला प्लेऑफसाठी कोणत्याही सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. मात्र या सामन्यात पाऊस आरसीबीसाठी व्हिलन ठरु शकतो. या सामन्यादरम्यान पावसाची तीव्र शक्यता वर्तवण्यात येत आहे. या सामन्यादरम्यान या स्टेडियम परिसरात हवामान कसं असेल, हे जाणून घेऊयात.

आरसीबीचा पावसामुळे गेम ओव्हर?

वेदर डॉट कॉमनुसार, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध गुजरात टायटन्स या सामन्यात पाऊस होण्याची 60 टक्के शक्यता आहे. सामना सुरु होण्याच्या वेळेआधी पावसाची 70 टक्के शक्यता आहे. त्यानंतर पुढील 3 तासांमध्ये पाऊसाची शक्यता ही 58 ते 63 टक्के आहे

ताज्या आकडेवारीनुसार मुंबई आणि आरसीबी या दोन्ही संघांच्या नावावर प्रत्येकी 14-14 पॉइंट्स आहेत. मात्र आरसीबी चांगल्या नेट रनरेटसह चौथ्या क्रमांकावर आहे. तर मुंबईचा नेट रनरेट हा मायन्समध्ये आहे. त्यामुळे मुंबई 14 पॉइंट असूनही सहाव्या स्थानी आहे. मुंबई हैदराबाद विरुद्ध वानखेडे स्टेडियममध्ये आपला साखळी फेरीतील शेवटचा सामना खेळत आहे. या सामन्यात मुंबईने आणि दुसऱ्या सामन्यात आरसीबीने गुजरातवर विजय मिळवल्यास निकाल हा नेट रनरेटच्या आधारावर ठरेल.

मात्र मुंबईचा विजय झाला आणि आरसीबी विरुद्ध गुजरात सामन्यात पाऊस झाला, तर पलटण प्लेऑफमध्ये पोहचणारी चौथी टीम ठरेल. कारण मुंबईचे विजयासह 16 पॉइंट्स होतील. तर पावसामुळे 1-1 पॉइंट्स वाटून गेल्याने आरसीबीचे एकूण 15 पॉइंट्स होतील.