मुंबई | क्रिकेट टीम इंडिया जुलै महिन्यात वेस्टइंडिज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया वेस्टइंडिज विरुद्ध कसोटी, एकदिवसीय आणि टी 20 मालिका खेळणार आहे. टेस्ट सीरिज 2 सामन्यांची, वनडे सीरिज 2 मॅचची आणि टी 20 मालिका ही 5 सामन्यांची असणार आहे. बीसीसीआयने यापैकी कसोटी आणि एकदिवसीय या पहिल्या 2 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.
टीम इंडियाच्या या दौऱ्याची सुरुवात ही कसोटी मालिकेने होणार आहे. एकूण 2 सामन्यांची ही टेस्ट सीरिज असणार आहे. पहिला कसोटी सामना हा 12 जुलैपासून खेळवण्यात येणार आहे. या विंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेतून टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पयिनशीप 2023-25 मोहिमेला सुरुवात करणार आहे.
वेस्टइंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया
NEWS – India’s squads for West Indies Tests and ODI series announced.
TEST Squad: Rohit Sharma (Capt), Shubman Gill, Ruturaj Gaikwad, Virat Kohli, Yashasvi Jaiswal, Ajinkya Rahane (VC), KS Bharat (wk), Ishan Kishan (wk), R Ashwin, R Jadeja, Shardul Thakur, Axar Patel, Mohd.… pic.twitter.com/w6IzLEhy63
— BCCI (@BCCI) June 23, 2023
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल निमित्ताने अजिंक्य रहाणे याने टीम इंडियात 17 महिन्यांनी कमबॅक केलं. आता रहाणेला विंडिज विरुद्ध मोठी जबाबदारी मिळाली आहे. रहाणेला उपकर्णधार करण्यात आलंय. रहाणेने wtc final 2023 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध चिवट खेळी करत टीम इंडियाची लाज राखली होती. रहाणेला त्याच्या या कामगिरीच बक्षिस मिळालंय.
तर दुसऱ्या बाजूला चेतेश्वर पुजारा याचा अखेर निवड समितीने पुन्हा एकडा डब्बा गूल केलाय. पुजारा याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये घोर निराशा केली. पुजाराने आयपीएल दरम्यान इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेटमध्ये द्विशतक आणि शतकं ठोकली होती. त्यामुळे त्याच्याकडून या महाअंतिम सामन्यात चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. मात्र पुजारा अपयशी ठरला. त्यामुळे बीसीसीआयने अखेर पुजाराला बाहेरचा रस्ता दाखवलाय.
बीसीसीआयने या कसोटी मालिकेत 3 युवा खेळाडूंना पहिल्यांदाच संधी दिली आहे. यामध्ये ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयस्वाल आणि मुकेश कुमार या तिघांचा समावेश आहे. यशस्वी आणि मुकेश हे दोघे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये राखीव खेळाडू होते. ऋतुराजला लग्नामुळे या महाअंतिम सामन्याला मुकावं लागलं होतं. त्यामुळे राखीव खेळाडू म्हणून ऋतुराजच्या अनुपस्थितीत यशस्वी याला संधी देण्यात आली होती.
दरम्यान नवदीप सैनी याचं टीम इंडियात जवळपास अडीच वर्षांनी पुनरागमन झालंय. नवदीप अखेरचा कसोटी सामना हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध बॉर्डर गावसकर ट्रॉफी जानेवारी 2021 मध्ये खेळला होता. अनेक महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर नवदीपला संघात स्थान मिळालंय.
1) विंडिज विरुद्ध टीम इंडिया, पहिली कसोटी, 12 ते 16 जुलै, विंडसर पार्क, डोमिनिका
2) विंडिज विरुद्ध टीम इंडिया, दुसरी कसोटी, 20 ते 24 जुलै, क्विन्स पार्क, पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद.
विंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, आर जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट आणि नवदीप सैनी.