भारतीय रेल्वेत 7934 पदांवर भरती, सरकारी नोकरी करण्याची हीच ‘ती’ सुवर्णसंधी….

| Updated on: Jul 23, 2024 | 1:55 PM

RRB JE Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी वेळ न घालता लगेचच अर्ज करावा. थेट रेल्वे विभागात नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावी लागतील.

भारतीय रेल्वेत 7934 पदांवर भरती, सरकारी नोकरी करण्याची हीच ती सुवर्णसंधी....
Railwहा रेल्वे ट्रॅक सन 1903 मध्ये सुरु केला. 1916 मध्ये रेल्वे लाईनचे काम पूर्ण झाले होते. सन 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतीय रेल्वेने या कंपनीसोबत करार केला. त्यामुळे हा ट्रॅक वापरण्यासाठी त्यांना दरवर्षी कंपनीला रॉयल्टी द्यावी लागत होती.ay
Follow us on

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच भरतीसाठी अर्ज करावा. विशेष म्हणजे केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. या भरती प्रक्रियेला लवकरच सुरूवात होणार आहे. रेल्वे विभागाकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. विशेष म्हणजे ही एकप्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरतीच म्हणावी लागेल. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.

रेल्वे विभागात नोकरी करण्याची संधी असून या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागतील. रेल्वे भर्ती बोर्ड, मुंबई यांनी कनिष्ठ अभियंता पदांच्या ही भरती राबवत आहे. या भरती प्रक्रियेतून 7934 पदे ही भरली जातील. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. 

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 30 जुलै 2024 पासून सुरू होणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 29 ऑगस्ट 2024 आहे. इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. rrbapply.gov.in. या साईटवर जाऊन तुम्हाला भरतीसाठी अर्ज ही करावी लागतील.

याच साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती देखील आरामात मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशनमध्ये पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. 18 ते 36 वयोगटातील उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. 

विशेष म्हणजे भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या उमेदवारांना चांगला पगार देखील मिळणार आहे. भरतीसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवारांनी अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 500 रुपये रूपये फीस ही भरावी लागेल. प्रवर्गातील उमेदवारांना 25o रूपये फीस ही भरावी लागणार आहे.