3445 पदांसाठी भरती, अशी आहे अर्ज करण्याची पद्धत, सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी

| Updated on: Sep 21, 2024 | 2:40 PM

RRB NTPC Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे थेट रेल्वेत नोकरी करण्याची संधी ही तुमच्याकडे आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावा. ही मोठी संधी नक्कीच आहे.

3445 पदांसाठी भरती, अशी आहे अर्ज करण्याची पद्धत, सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी
Railway
Follow us on

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावीत. विशेष म्हणजे थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी ही तुमच्याकडे आहे.  रेल्वे भर्ती बोर्डाने पदवीपूर्व पदांवरील रिक्त जागांसाठी नोंदणी सुरू केली आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अर्ज करावीत. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेतून 3445 पदे ही भरली जाणार आहेत. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची प्रक्रिया. 

ही भरती प्रक्रिया रेल्वे विभागाकडून राबवली जातंय. विशेष म्हणजे थेट रेल्वे विभागात नोकरी करण्याची संधी ही तुमच्याकडे आहे. आजपासून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालीये. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 ऑक्टोबर 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला अर्ज ही करावी लागणार आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. पदवी आणि पदव्युत्तर पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदवीधर पदांसाठी 14 सप्टेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात होत असून याद्वारे एकूण 8113 पदे भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी 18 ते 33 वयोगटापर्यंतचे उमेदवार हे आरामात अर्ज करू शकतात. 

या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना विविध प्रकारच्या परीक्षा देखील द्याव्या लागणार आहेत. त्यानंतर उमेदवाराची निवड ही केली जाईल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 500 रूपये फीस देखील द्यावी लागणार आहे.

यामध्ये प्रवर्गातील उमेदवारांना फीसमध्ये सुट ही देण्यात आलीये. RRB च्या साईटवर जाऊन आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा लागणार आहे. उमेदवाराने भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर अधिसूचना ही अगोदर व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावीत. ही एक प्रकारची मोठी संधी नक्कीच म्हणावी लागेल.