pune porsche accident: अपघातानंतर अजित पवार यांनी पोलीस आयुक्तांना फोन केला का ? स्वत: अजित पवार म्हणाले…

| Updated on: Jun 01, 2024 | 10:02 AM

pune porsche accident: आमदार सुनील टिंगरे गेले होते. त्यांनी कोणताही दबाव आणला नाही. हे प्रकरण आता जनतेचे प्रकरण झाले आहे. या प्रकरणात चौकशी पारदर्शकपणे करा. कोणाच्या दबावास बळी पडू नका, इतक्याच सूचना आम्ही अधिकाऱ्यांना करत आहे.

pune porsche accident: अपघातानंतर अजित पवार यांनी पोलीस आयुक्तांना फोन केला का ? स्वत: अजित पवार म्हणाले...
अजित पवार
Follow us on

पुणे बड्या बिल्डरच्या मुलाने भरधाव पोर्श कार चालवत १९ मे रोजी अपघात केला होता. त्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणात आतापर्यंत दहा जणांना अटक झाली आहे. त्यात बिल्डर अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल, आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांचा समावेश आहे. आता त्या मुलाची आई शिवाणी अग्रवाल हिला शनिवारी अटक झाली. या प्रकरणात रोज अनेक आरोप-प्रत्यारोप होत आहेत. या सर्व प्रकरणात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेसंदर्भात आरोप होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे पोलीस ठाण्यात गेले होते, त्यांनी आरोपींना वाचवण्यासाठी राजकीय दबाव आणला होता, अजित पवार यांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तांना फोन केलो होतो? असे आरोप होत आहेत. त्या सर्व आरोपांवर अजित पवार यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना उत्तर दिले.

आमदारांनी दबाव आणला का?

अजित पवार म्हणाले की, राज्यात सर्वत्र त्या भागातील आमदार एखादी घटना घडल्यानंतर पोलीस ठाण्यात जात असतात. तो त्या ठिकाणी जाऊन पोलिसांना योग्य चौकशी करण्याचा सूचना देतो. त्यानुसार आमदार सुनील टिंगरे गेले होते. त्यांनी कोणताही दबाव आणला नाही. हे प्रकरण आता जनतेचे प्रकरण झाले आहे. या प्रकरणात चौकशी पारदर्शकपणे करा. कोणाच्या दबावास बळी पडू नका, इतक्याच सूचना आम्ही अधिकाऱ्यांना करत आहे.

मी फोन केला नाहीच…

अपघातानंतर पोलीस आयुक्तांना आपण फोन केला नाही, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. या प्रकरणात फोन केला असता तरी जखमींना मदत तातडीने द्या आणि आरोपींवर कारवाई करा, अशाच सूचना आम्ही देत असतो, असे अजित पवार यांनी सांगितले. यामुळे या प्रकरणात त्यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना फोन केला नाही, असा दावा त्यांनी केला.

हे सुद्धा वाचा

पुणे अपघात प्रकरणातील डॉ. अजय तवारे यांची शिफारस मंत्री हसन मुश्रीफ आणि एनसीपी आमदार सुनील टिंगरे यांनी शिफारस केल्याचे समोर आले. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, बदलीची शिफारस आम्ही करतो. परंतु ते नियमात आहे की नाही, हे बघण्याचे काम अधिकाऱ्यांचे आहे. आमचे शिफारस पत्र असते. त्यानंतर अधिकाऱ्यांनी नियम पाहून बदली करायला पाहिजे.