UPSC story: ही आहे UPSC परीक्षा उत्तीर्ण होणारी पहिली भारतीय महिला!

| Updated on: Jun 12, 2023 | 10:22 AM

1951 साली वयाच्या 27 व्या वर्षी नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झाल्या आणि त्यांना मुलाखतीसाठी बोलावले गेले. मुलाखत समितीने अण्णा राजम मल्होत्रा यांना परदेशी किंवा केंद्रीय सेवेत सामील होण्यास राजी केले होते कारण ते महिलांसाठी "अधिक योग्य" होते, परंतु त्या आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या आणि त्या नागरी सेवेच्या मद्रास कॅडरमध्ये दाखल झाल्या.

UPSC story: ही आहे UPSC परीक्षा उत्तीर्ण होणारी पहिली भारतीय महिला!
First woman IAS anna rajam malhotra
Follow us on

मुंबई: UPSC नागरी सेवा परीक्षा ही भारतातील विद्यार्थ्यांसाठी सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. रवींद्रनाथ टागोर यांचे बंधू सत्येंद्रनाथ टागोर हे यूपीएससी नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण करणारे पहिले भारतीय व्यक्ती होते. पण यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होणारी पहिली भारतीय महिला कोण होती हे तुम्हाला माहित आहे का?

अण्णा राजम मल्होत्रा या यूपीएससी नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पहिल्या भारतीय महिला आणि 1947 मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या महिला आयएएस अधिकारी होत्या. अण्णा राजम मल्होत्रा यांनी 1951 ते 2018 या काळात मद्रासमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री सी. राजगोपालाचारी यांच्या हाताखाली काम केले होते.

अण्णा राजम मल्होत्रा यांची प्रदीर्घ आणि यशस्वी कारकीर्द असून त्यांनी अनेक पैलूंवर कामही केले आहे. 1982 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी त्या राजीव गांधी यांच्या संघाचाही भाग होत्या.

1951 साली वयाच्या 27 व्या वर्षी अण्णा राजम मल्होत्रा नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झाल्या आणि त्यांना मुलाखतीसाठी बोलावले गेले. मुलाखत समितीने अण्णा राजम मल्होत्रा यांना परदेशी किंवा केंद्रीय सेवेत सामील होण्यास राजी केले होते कारण ते महिलांसाठी “अधिक योग्य” होते, परंतु त्या आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या आणि त्या नागरी सेवेच्या मद्रास कॅडरमध्ये दाखल झाल्या.

अण्णा राजम मल्होत्रा यांच्या जॉईनिंग लेटरमध्ये लग्नानंतर त्यांची सेवा बंद करण्यात येणार असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. मात्र, नंतर हा नियम बदलण्यात आला. तत्कालीन मुख्यमंत्री सी. राजगोपालाचारी यांनाही चिंता होती आणि “महिलांनी नागरी दलात काम करू नये” असे त्यांचे मत होते. उपजिल्हाधिकारी म्हणून एका महिलेला नियुक्त करण्यास त्यांना “संकोच” वाटत होता.

अण्णा राजम मल्होत्रा यांनी आयुष्यभर आपल्या पुरुष सहकाऱ्यांसोबत काम केले आणि कठोर परिश्रम, कौशल्य आणि ज्ञानाच्या जोरावर नेहमीच विजयी झाल्या. अण्णा राजम मल्होत्रा नंतर होसूर जिल्ह्याच्या पहिल्या महिला जिल्हा उपजिल्हाधिकारी बनल्या. पुढे त्यांनी वॉशिंग्टन येथील आंतरराष्ट्रीय नाणेनिधीत भारताचे कार्यकारी संचालक म्हणूनही काम पाहिले.

दुर्दैवाने अण्णा राजम मल्होत्रा यांचे सप्टेंबर 2018 मध्ये वयाच्या 91 व्या वर्षी मुंबईत निधन झाले, मात्र त्यांची कहाणी आजही जिवंत आहे. त्यांच्या निधनानंतरही अण्णा राजम मल्होत्रा सर्व महिला अधिकाऱ्यांसाठी प्रेरणास्थान आहेत.