Khatron Ke Khiladi 14 चा विजेता ठरला करणवीर, ट्रॉफीसह मिळाली मोठी रक्कम आणि आलिशान कार

| Updated on: Sep 30, 2024 | 9:23 AM

Khatron Ke Khiladi 14: गश्मीर महाजनी, कृष्णा श्रॉफ यांना मागे टाकत करणवीर याने मारली बाजी, ट्रॉफीसह मोठी रक्कम आणि कार मिळाल्यानंतर म्हणाला, 'बेशुद्ध होणार होतो पण...'. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त करणवीर याची चर्चा...

Khatron Ke Khiladi 14 चा विजेता ठरला करणवीर, ट्रॉफीसह मिळाली मोठी रक्कम आणि आलिशान कार
Follow us on

Khatron Ke Khiladi 14: ‘खतरों के खिलाडी 14’ शोला अखेर विजेता मिळला आहे. अभिनेता करणवीर मेहरा याने ‘खतरों के खिलाडी 14’ शो स्वतःच्या नावावर केला आहे. अभिनेता गश्मीर महाजनी आणि कृष्णा श्रॉफ हिला मागे टाकत करणवीर याने बाजी मारली आहे. ‘खतरों के खिलाडी 14’ शोची ट्रॉफी जिंकल्यानंतर करणवीर याला चमकती ट्रॉफी, आलिशान कार आणि 20 लाख रुपये बक्षीस म्हणून मिळाले आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘खतरों के खिलाडी 14’ शोचा विजेता करणवीर याची चर्चा होत आहे. विजेता म्हणून घोषित झाल्यानंतर अभिनेत्याने मनातील भावना देखील व्यक्त केल्या आहेत.

‘खतरों के खिलाडी 14’ शो जिंकल्यानंतर भावना व्यक्त करत करणवीर म्हणाला, ‘मी जिंकलो आहे यावर अद्यापही विश्वास बसत नाहीये. सतत मुलाखती देत असल्यामुळे मला आनंद होत आहे. असं वाटत आहे की मला ISI मार्क मिळाला आहे.’ असं अभिनेता म्हणाला.

पुढे अभिनेत्याला विचारण्यात आलं की, ‘खतरों के खिलाडी 14’ शो तू जिंकशील याची तुला कल्पना होती का? यावर करणवीर म्हणाला, ‘मनात एक भावना होती की, मी शो जिंकेल. प्रत्येकाच्या मनात जिंकण्याची भावना होती. पण जेव्हा माझ्या नावाची घोषणा करण्यात आली. तेव्हा मी सुन्न झालो. मला काहीच कळत नव्हतं माझ्या आजू-बाजूला काय घडत आहे…’

 

 

करणवीर पुढे म्हणाला, ‘सर्वकाही स्लो मोशनमध्ये सुरु होतं. मी सुन्न झालो होतो. मी जवळपास बेशुद्ध होणार होतो. जेव्हा रोहित शेट्टी यांनी माझ्या नावाची घोषणा केली तेव्ही विजेता बेशुद्ध झालाय ऐकायल चांगलं वाटलं नसतं..’ असं अभिनेता विनोदी अंदाजात म्हणाला.

पुढे येणाऱ्या संधींबद्दल अभिनेता म्हणाला, ‘मला लवकरच कळेल की, ही ट्रॉफी माझ्यासाठी अनेक नव्या गोष्टी घेवून येईल. आता नव्या संधी मिळत आहेत. त्यामुळे योग्य पर्यायाची निवड करता आली पाहिजे. वेग-वेगळ्या भूमिका मी साकारू शकतो आणि मानधनात देखील थोडीफार वाढ होईल…’ असं देखील अभिनेता म्हणाला. आता करणवीर मेहरा ‘बिग बॉस 18’ मध्ये झळकणार असल्याची चर्चा रंगली आहे. पण यावर अभिनेत्याने अधिकृत वक्तव्य केलं नाही.