नाती बनतायत-बिघडतायत..; अभिषेक-करिश्माच्या मोडलेल्या साखरपुड्यावर काय म्हणाले बिग बी?

| Updated on: Aug 12, 2024 | 11:15 AM

दिग्दर्शक सुनील दर्शन यांच्या ‘हां मैने भी प्यार किया’ या चित्रपटासाठी दोघांनी सोबत काम केलं होतं. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सुनील यांना अभिषेक-करिश्मामधली जवळीक स्पष्ट दिसू लागली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला आणि त्याचसोबत अभिषेक-करिश्माचं नातंसुद्धा संपुष्टात आलं.

नाती बनतायत-बिघडतायत..; अभिषेक-करिश्माच्या मोडलेल्या साखरपुड्यावर काय म्हणाले बिग बी?
Amitabh and Abhishek Bachchan and Karisma Kapoor
Image Credit source: Instagram
Follow us on

गेल्या काही दिवसांपासून बच्चन कुटुंब सतत सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहे. एकीकडे ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या जोरदार चर्चा होत्या. तर दुसरीकडे जया बच्चन यांनी संसदेतील त्यांच्या वक्तव्याने सर्वांचं लक्ष वेधलंय. अशातच अमिताभ बच्चन यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये ते अभिषेक आणि करिश्मा कपूर यांच्या मोडलेल्या साखरपुड्याबद्दल दु:ख व्यक्त करताना दिसत आहेत. एकेकाळी बॉलिवूड इंडस्ट्रीत अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर यांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा होत्या. इतकंच नव्हे तर या दोघांनी साखरपुडासुद्धा केला होता, असं म्हटलं जातं. मात्र लग्नाआधीच या दोघांचं नातं तुटलं. कपूर आणि बच्चन कुटुंबीयांमध्ये खास नातेसंबंध सुरू होण्याआधीच सर्वकाही संपुष्टात आलं होतं.

अमिताभ बच्चन यांचा हा व्हिडीओ करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमधील आहे. या शोमध्ये करण त्यांना अभिषेक आणि करिश्माच्या साखरपुड्याविषयी प्रश्न विचारतो. “कुटुंबासाठी ती वेळ फार कठीण होती का?”, असा सवाल करण बिग बींना करतो. त्यावर ते म्हणतात, “ते अत्यंत नाजूक क्षण होते. नाती बनत होत्या आणि बिघडत होत्या. कोणत्याही व्यक्तीसाठी हे सर्व सहन करणं खूप कठीण असतं. जर परिस्थिती तुमच्यासाठी ठीक नसेल तर मार्ग वेगळे करण्यातच तुमचं भलं असतं.”

हे सुद्धा वाचा

बच्चन कुटुंबीयांनी तर एका पत्रकार परिषदेत करिश्माचा उल्लेख ‘होणारी सून’ असा केला होता. जया बच्चन यांनी एका पत्रकार परिषदेत करिश्माचा उल्लेख ‘माझी होणारी सून’ असा केला होता. माध्यमांसमोर त्यांनी करिश्मा आणि अभिषेकचं लग्न जाहीर केलं होतं. यावेळी मंचावर संपूर्ण बच्चन कुटुंब उपस्थित होतं. या घटनेच्या बऱ्याच वर्षांनंतर दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी एका मुलाखतीत अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर यांच्या तुटलेल्या नात्याविषयी खुलासा केला होता. अभिषेक आणि करिश्माने 2000 मध्ये जवळपास पाच वर्षे एकमेकांना डेट केलं होतं. लग्नाच्या निर्णयापर्यंत पोहोचलेल्या या दोघांचा साखरपुडासुद्धा झाला होता. मात्र त्यानंतर त्याचं नातं तुटलं.