जया बच्चन यांचे ‘हे’ स्वप्न अपूर्ण, मोठा खुलासा, अखेर मनातील बोलत..

| Updated on: Feb 23, 2024 | 2:19 PM

जया बच्चन यांनी एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. विशेष म्हणजे अजूनही धमाकेदार भूमिका करताना जया बच्चन या कायमच दिसतात. जया बच्चन या राजकारणात देखील सक्रिय असतात. जया बच्चन कायमच त्यांच्या विधानामुळे चर्चेत असतात, बऱ्याच वेळा त्यांच्यावर जोरदार टीका देखील होते.

जया बच्चन यांचे हे स्वप्न अपूर्ण, मोठा खुलासा, अखेर मनातील बोलत..
Follow us on

मुंबई : जया बच्चन या कायमच चर्चेत असतात. जया बच्चन यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. जया बच्चन यांनी एक मोठा काळ बाॅलिवूड चित्रपटांमध्ये गाजवला आहे. जया बच्चन यांचे अनेकदा सोशल मीडियावर काही व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतात. या व्हिडीओमध्ये त्या कायमच पापाराझी यांच्यावर भडकताना दिसतात. बऱ्याच वेळा जया बच्चन यांना त्यांच्या विधानामुळे सोशल मीडियावर जोरदार खडेबोल देखील सुनावले जातात. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सतत सुरू आहे. मात्र, असे असताना देखील जया बच्चन यांनी त्यावर काहीच भाष्य केले नाहीये.

नुकताच आता जया बच्चन या नात नव्या नवेली नंदा हिच्या शोमध्ये पोहचल्या. यावेळी काही मोठे खुलासे हे जया बच्चन यांच्याकडून करण्यात आले. विशेष म्हणजे यावेळी जया बच्चन या त्यांच्या अपूर्व राहिलेल्या स्वप्नांबद्दल बोलताना देखील दिसल्या. जया बच्चन यांनी या शोमध्ये काही मोठे खुलासे हे केले आहेत. यावेळी त्या करिअरबद्दल बोलताना देखील दिसल्या.

जया बच्चन म्हणाल्या की, आमच्यावेळी स्त्री पुरूष समानता शिक्षणामध्ये नव्हती. त्यावेळी काही कोर्सला मुलींना साधा प्रवेश देखील दिला जात नसे. विशिष्ट कोर्सेस फक्त मुलींसाठी असायचे. त्यावेळी जर एखादा पुरूष शेजारी बसला असेल आणि एखादी महिला गाडी चालवत असेल तर वेगळ्या नजरेने बघितले जायते. आता खरोखरच या गोष्टींमध्ये मोठे बदल झाले आहेत.

हेच नाही तर आता त्या गोष्टीच राहिल्या नाहीत. पुढे जया बच्चन या म्हणाल्या की, त्यांना आपले करिअर हे आर्मीमध्ये करायचे होते. आर्मीमध्ये नोकरी करण्याची त्यांची इच्छा होती. मात्र, त्यांची ती इच्छा पूर्ण होऊ नाही शकली. जया बच्चन यांचे आर्मीमध्ये जाण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. याबाबत खंत व्यक्त करताना जया बच्चन या दिसल्या आहेत.

काही दिवसांपूर्वीच नव्या हिच्याच शोमध्ये श्वेता बच्चन हिने मोठा खुलासा केला. श्वेता बच्चन म्हणाली की, आम्ही लहान असताना आई (जया बच्चन) ला एक सवय होती. तिला कायमच केसांना कांद्याचा रस लावण्याची सवय होती. मात्र, कांद्याच्या वासाने घरात सर्वत्र दुर्गंधी पसरत असे. मला तर बऱ्याच वेळा यामुळे घर सोडून जावे वाटत होते.