अनिरुद्धाचार्यांचे सुपरस्टार्सवर गंभीर आरोप; म्हणाले, ‘पैशांसाठी चुकीच्या गोष्टींचा…’

| Updated on: Aug 23, 2024 | 12:23 PM

Aniruddhacharya ji maharaj: कोट्यवधी रुपयांच्या कमाईसाठी सेलिब्रिटी करतात चुकीचं काम..., बड्या सुपरस्टार्सवर अनिरुद्धाचार्यांनी साधला निशाणा; म्हणाले, 'पैशासाठी चुकीच्या गोष्टींचा...', सध्या सर्वत्र त्यांच्या वक्तव्याची चर्चा...

अनिरुद्धाचार्यांचे सुपरस्टार्सवर गंभीर आरोप; म्हणाले, पैशांसाठी चुकीच्या गोष्टींचा...
Follow us on

धार्मिक आणि अध्यात्मिक गुरु अनिरुद्धाचार्य जी महाराज यांचे असंख्य अनुयायी आहेत. त्यांच्या प्रवचनांचे आणि अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो टीव्ही रिॲलिटी शो ‘लाफ्टर शेफ फन अनलिमिटेड’मध्ये दिसले. मिळालेल्या माहितीनुसार, अनिरुद्धाचार्य यांना ‘बिग बॉस 18’ साठी देखील विचारण्यात आलं. पण त्यांनी शोमध्ये जाण्यास नकार दिला. आता नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अनिरुद्धाचार्य यांनी तरुण पिढीतील नकारात्मक गोष्टी, वाईट गोष्टी आणि सोशल मीडियाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

नुकताच झालेल्या मुलाखतीत अनिरुद्धाचार्य यांनी ‘लाफ्टर शेफ फन अनलिमिटेड’ शोचं कौतुक केलं. ‘ लाफ्टर शोमध्ये लोकं आणि कलर्स टीव्हीचे सर्व कर्मचारी चांगले आहेत. उत्तम काम करत आहेत. आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजासोबत धर्माला देखील जोडण्याचा प्रयत्न करत आहे. शोच्या माध्यमातून आपण हसण्यासोबत धर्माशी जोडू शकतो. त्यामुळे सर्वांनी हा कार्यक्रम जरूर पाहावा.’

पुढे अनिरुद्धाचार्य म्हणाले, ‘सुरुवातील मला थोडी भीती वाटली, त्यानंतर सर्व काही ठिक वाटलं. आता मी विचार करतो, मला असं वाटतं मी लोकांना हसवू देखील शकतो. पण टीव्हीवर माझा पहिला अनुभव होता. त्यामुळे मला काय करायला हवं आणि काय करायला नको… यावर देखील मी विचार केला. कारण कोणाच्या भावनांना ठेच पोहोचू नये… असा माझा हेतू होता..’

बॉलिवूडबद्दल देखील अनिरुद्धाचार्य यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ‘बॉलिवूड आता वेगळ्या दिशेने प्रवास करत आहे. ज्यामुळे बॉलिवूडमध्ये काही बदल नक्कीच झाले पाहीजे. बॉलिवूड गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक गोष्टीचा प्रचार करत आहे. प्रचार करण्यापूर्वी ती गोष्ट वाईट आहे… याची खात्री देखील करुन घेत नाहीत..’

‘गुटखा, सिगारेट, दारू… इत्यादी वाईट गोष्टींचा प्रचार सेलिब्रिटी करत आहे. ज्याचा प्रभाव तरुण पिढीवर पडत आहे. तरूणाई सेलिब्रिटींकडून प्रेरणा घेत असते. त्यामुळे फक्त पैशांसाठी सेलिब्रिटींनी चुकीच्या गोष्टींचा प्रचार करु नये…’ असं आवाहन अनिरुद्धाचार्य यांनी केलं.

‘देशाची तरुण पिढी वाईट दिशेने जात आहे. त्यामुळे काही गोष्टींवर आपण स्वतः आळा घालायला हवा. सेलिब्रिटी समाजासाठी प्रेरणा आहेत आणि लोकं त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालतात त्यामुळे सेलिब्रिटींनी देखील विचार करायला हवा… ही त्यांची जबाबदारी आहे. बदल होण्याची नितांत गरज आहे…’ असं देखील अनिरुद्धाचार्य महाराज म्हणाले.