कंगना रनौत कानशिलात प्रकरण, चिराग पासवान म्हणाले, ‘महिला कॉन्स्टेबलच्या भावना समजू शकतो पण…’

| Updated on: Jun 11, 2024 | 1:21 PM

Cabinet Minister Chirag Paswan on Kangana Ranaut | 'महिला कॉन्स्टेबलच्या भावना समजू शकतो पण...', कंगनाला महिला CISF जवानाने लगावली कानशिलात, कॅबिनेट मंत्री चिराग पासवान यांचं मोठं वक्तव्य... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त चिराग पासवान यांच्या वक्तव्याची चर्चा...

कंगना रनौत कानशिलात प्रकरण, चिराग पासवान म्हणाले, महिला कॉन्स्टेबलच्या भावना समजू शकतो पण...
Follow us on

अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रनौत विजयाचा आनंद साजरा करत असतानाच एका महिला CISF जवानाने त्यांना कानशिलात लगावली. कंगना चंदीगड विमानतळावर असताना त्यांना महिला CISF जवानाने कानशिलात लगावली. यावर अनेकांनी नाराजी व्यक्त करत कंगना यांचं समर्थन केलं. आता हाजीपूरचे खासदार आणि लोक जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान यांनी देखील यावर मोठं वक्तव्य केलं आहे.

चिराग पासवान म्हणाले, ‘तुम्ही तुमचं म्हणणं मांडण्यासाठी शिव्या आणि मारहाण करत असाल तर हे चुकीचं आहे. प्रत्येक व्यक्तीला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. प्रत्येक जण आपले विचार मांडू शकतो. महिला कॉन्स्टेबलच्या भावना देखील मी समजू शकतो, त्यांची त्याठिकाणी आई बसली होती, त्यांना वाईट वाटलं असेल. पण मर्यादीत शब्दांत त्यांनी स्वतःच्या भावना मांडायला हव्या होत्या…

पुढे चिराग पासवान म्हणाले, ‘प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वतंत्र्य आहे. कंगना यांनी स्वतःचं म्हणणं मांडलं. त्याच प्रमाणे महिला CISF जवानाने त्यांचं म्हणणं मांडायला हवं होतं. कोणतीही व्यक्ती महिला किंवा पुरुषावर हात उचलू शकत नाही. फक्त महिलांवर हात उचलू नये असं मी म्हणत नाही, पुरुषांवर देखील हात उचलणं चुकीचं आहे… तुम्ही विरोध करण्यासाठी मर्यादित शब्दांचा वापर करू शकता…’ सध्या सर्वत्र चिराग पासवान यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

हे सुद्धा वाचा

कंगना रनौत हिचा राजकारणातील प्रवास

कंगना यांनी बॉलिवूडमध्ये स्वतःची भक्कम ओळख तर निर्माण केलीच आहे. पण लोकसभा निवडणूक 2024 मध्ये देखील त्यांनी स्वतःचा ठसा उमटवला आहे. कंगना यांनी हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून विजयाचा झेंडा फडकावला आहे. प्रचंड बहुमताने निवडणूक जिंकल्यामुळे कंगना चर्चेत आल्या.

चिराग पासवान यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, राजकारणात येण्यापूर्वी चिराग पासवान यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. अभिनेत्री कंगना रनौत यांच्यासोबत चिराग यांनी पहिल्या सिनेमात काम केलं. 2011 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मिले ना मिले हम’ सिनेमात दोघे एकत्र दिसले होते. सध्या चिराग पासवान यांचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.