गेल्या कित्येक दिवसांपासून ज्या क्षणाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पहात होते तो क्षण अखेर आलाय. आई कुठे काय करते मालिकेत अभिषेक आणि अनघाच्या साखरपुड्याची धामधूम सुरु झाली आहे.
अभिवरचे खुनाचे आरोप खोटे आहेत हे सिद्ध झाल्यानंतर आता त्याच्या आयुष्याची नव्याने सुरुवात होणार आहे.
अभिषेक-अनघाच्या साखरपुड्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा देशमुख कुटुंबात आनंदाचं वातावरण पाहायला मिळतं आहे.
नाचगाण्यांचा धमाल कार्यक्रमही रंगणार आहे. देखमुख कुटुंबातलं हे हसतं खेळतं वातावरण आणखी किती काळ टिकणार हे पहाणं उत्सुकतेचं असेल.
कारण संजनारुपी वादळ या कुटुंबावर दबा धरुन बसलेलं आहेच.
त्यामुळे अभिषेक आणि अनघाचा साखरपुडा निर्विघ्न पाह पडणार का हे मालिकेच्या पुढील भागांमधून पाहायला मिळेल.