‘माचिस’ फेम अभिनेत्याला मुलासोबत पाहून चाहते थक्क! नेटकरी म्हणाले ‘कधीच विसरू शकत नाही’

| Updated on: Jul 02, 2023 | 5:12 PM

'आठवतंय का, म्हणजे काय? ज्यांनी कोणी आर्या पाहिला असेल त्यांना समजेल की सुष्मिता सेनपेक्षा या अभिनेत्याला पाहण्याची उत्सुकता अधिक होती', असं एकाने लिहिलं. तर 'आमदनी अठ्ठनी खर्चा रुपय्या' या चित्रपटाचं नाव लिहित अनेकांनी त्याचं कौतुक केलं.

माचिस फेम अभिनेत्याला मुलासोबत पाहून चाहते थक्क! नेटकरी म्हणाले कधीच विसरू शकत नाही
Chandrachur Singh
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई : बॉलिवूडमध्ये असे बरेच कलाकार आहेत, ज्यांनी आपल्या दमदार अभिनयकौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. मात्र या कलाकारांना नशिबाची फारशी साथ मिळाली नाही. त्यामुळे त्यांचा इंडस्ट्रीतील कार्यकाळ हा फार कमी राहिला. मात्र या कमी काळातही या कलाकारांनी प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहतील अशा भूमिका साकारल्या आहेत. असाच एक अभिनेता म्हणजे चंद्रचूड सिंह. वयाची पन्नाशी ओलांडलेल्या या अभिनेत्याला नुकतंच पापाराझींनी मुंबई एअरपोर्टवर पाहिलं. यावेळी त्याच्यासोबत त्याचा मुलगासुद्धा होता. चंद्रचूडने यावेळी पापाराझींना फोटोसाठी मुलासोबत पोझ दिले. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

‘हा अभिनेता आठवतोय का’, असं कॅप्शन लिहित एका पापाराझी अकाऊंटवर चंद्रचूडचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला. त्यावर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ‘आठवतंय का, म्हणजे काय? ज्यांनी कोणी आर्या पाहिला असेल त्यांना समजेल की सुष्मिता सेनपेक्षा या अभिनेत्याला पाहण्याची उत्सुकता अधिक होती’, असं एकाने लिहिलं. तर ‘आमदनी अठ्ठनी खर्चा रुपय्या’ या चित्रपटाचं नाव लिहित अनेकांनी त्याचं कौतुक केलं. ‘चांगल्या कलाकारांना कोणीच विसरू शकत नाही’, असंही दुसऱ्या युजरने म्हटलंय.

हे सुद्धा वाचा

‘जोश’, ‘माचिस’ यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकलेला चंद्रचूड सिंह काही चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर इंडस्ट्रीतून गायब झाला. यामागचं कारण म्हणजे 2000 त्याचा भीषण अपघात झाला आणि त्यामुळेच त्याचं बॉलिवूडमधील करिअर संपुष्टात आलं होतं. गोव्यात जेट स्कीईंग करताना त्याचा तोल सुटला. त्याचवेळी त्याची स्पीड बोट वेगाने पुढे जात असताना चंद्रचूडच्या उजव्या हाताला जबर मार लागला. हा अपघात इतका भीषण होता की त्यात त्याचा हात पूर्णपणे धडापासून वेगळा झाला असता. पण दैव बलवत्तर म्हणून चंद्रचूडसोबत असं काही घडलं नाही. मात्र त्यानंतर त्याला आठ वर्षांचा ब्रेक घ्यावा लागला होता.