Kangana Ranaut | ‘त्या’ किसिंग सीननंतर अभिनेत्याच्या ओठांतून आलं रक्त? आरोपांवर कंगना म्हणाली ‘हृतिक रोशननंतर..’

| Updated on: Jul 24, 2023 | 1:42 PM

‘क्रिश 3’ चित्रपटादरम्यान हृतिक आणि आपल्यात प्रेमसंबंध असल्याचा दावा कंगनाने केला होता. मात्र हृतिकने कंगना खोटं बोलत असल्याचं सांगितलं होतं. या दोघांमधील वाद इतका वाढला होता की, दोघांनाही याप्रकरणी कायदेशीर मदत घ्यावी लागली.

Kangana Ranaut | त्या किसिंग सीननंतर अभिनेत्याच्या ओठांतून आलं रक्त? आरोपांवर कंगना म्हणाली हृतिक रोशननंतर..
Kangana Ranaut on kissing scene
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई | 24 जुलै 2023 : बॉलिवूडची क्वीन अर्थात अभिनेत्री कंगना रनौत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. एखादा राजकीय, सामाजिक मुद्दा असो किंवा सोशल मीडियावर व्हायरल होणारी एखादी पोस्ट.. कंगना त्यावर आवर्जून बिनधास्तपणे व्यक्त होते. नुकताच सोशल मीडियावर तिच्याबद्दलच्या एका वृत्ताची पोस्ट व्हायरल झाली. त्या पोस्टवर उत्तर देताना कंगनाने अभिनेता हृतिक रोशनचाही उल्लेख केला आहे. यामुळे पुन्हा एकदा कंगना आणि हृतिक यांचं नातं चर्चेत आलं आहे. 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रिवॉल्वर रानी’ या कंगनाच्या चित्रपटातील किसिंग सीनच्या वृत्ताबद्दलची ही पोस्ट होती.

कंगनाने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये हे वृत्त शेअर करत त्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. या वृत्तात असं लिहिलं आहे की, ‘रिवॉल्वर रानी’ या चित्रपटातील किसिंग सीनदरम्यान वीर दासच्या ओठांतून रक्त येऊ लागलं होतं. कंगना आणि वीर दास यांच्यातील हा किसिंग सीन होता. त्यावर प्रतिक्रिया देताना कंगनाने लिहिलं, ‘हृतिक रोशननंतर मी बिचाऱ्या वीर दासची अब्रू लुटली. हे कधी झालं?’ यासोबतच तिने हसण्याचा इमोजी पोस्ट केला.

हे सुद्धा वाचा

कंगना रनौत आणि हृतिक रोशन यांच्यातील वाद जगजाहीर आहे. 2016 – 2017 मध्ये हा वाद जोरदार चर्चेत होता. इतकंच नव्हे तर कंगनाविरोधात हृतिकने कोर्टात धाव घेतली होती. त्यावेळी प्रत्येक मुलाखतीत कंगना यावर बोलली होती. केवळ बोललीच नाही तर हृतिकबद्दल मनात असलेला सगळा राग तिने या मुलाखतींमध्ये व्यक्त केला होता.

‘क्रिश 3’ चित्रपटादरम्यान हृतिक आणि आपल्यात प्रेमसंबंध असल्याचा दावा कंगनाने केला होता. मात्र हृतिकने कंगना खोटं बोलत असल्याचं सांगितलं होतं. या दोघांमधील वाद इतका वाढला होता की, दोघांनाही याप्रकरणी कायदेशीर मदत घ्यावी लागली. या वादात त्यावेळी अनेकांनी कंगनाची बाजू घेत हृतिकवर टीका केली होती. तर हृतिकचे चाहते त्याच्या बाजून होते.

2020 मध्ये हृतिकने तिच्याविरोधात दाखल केलेला एफआयआर सायबर सेलकडून क्राइम इंटेलिजन्स युनिटकडे हलविण्यात आला होता. तेव्हा कंगनाने ट्विट केलं होतं की, ‘आता हृतिकने त्याच्या आयुष्यात पुढे जावं’. हृतिक आणि कंगनाने क्रिश 3 या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर आशिकी 3 मध्ये या दोघांना कास्ट केल्याची माहिती समोर आली. मात्र हृतिकने कंगनाला चित्रपट स्वीकारण्यास नकार दिला होता. तेव्हापासून दोघांमध्ये वादाला सुरुवात झाली.