‘तुला कानाखाली हवी का..’; अक्षय कुमार कतरिनाला असं का म्हणाला? सर्वांनाच बसला धक्का!

| Updated on: Aug 06, 2024 | 11:43 AM

अभिनेता अक्षय कुमार आणि कतरिना कैफ यांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. या दोघांमध्ये चांगली मैत्री आहे. मात्र एका चित्रपटाच्या सेटवर कतरिनाने अक्षयला असं काही विचारलं, जे ऐकून अक्षय तिला थेट म्हणाला "तुला कानाखाली हवंय का?"

तुला कानाखाली हवी का..; अक्षय कुमार कतरिनाला असं का म्हणाला? सर्वांनाच बसला धक्का!
Akshay Kumar and Katrina Kaif
Image Credit source: Instagram
Follow us on

अभिनेता अक्षय कुमार आणि कतरिना कैफ ही बॉलिवूडमधील सर्वांत लोकप्रिय ऑनस्क्रीन जोड्यांपैकी एक आहे. या दोघांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केलंय. कतरिना आणि अक्षयची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडते. या केमिस्ट्रीमुळेच त्यांचे चित्रपट हिट ठरले. किंबहुना ऑफस्क्रीनसुद्धा या दोघांमध्ये चांगली मैत्री पहायला मिळते. विविध कार्यक्रमांमध्ये आणि मुलाखतींमध्ये हे दोघं एकमेकांची थट्टामस्करी करताना दिसतात. पण एकदा कतरिनाने अक्षयसमोर अशी जिद्द केली होती, ज्यामुळे अक्षयची जीभ घसरली. तो तिला असं काही बोलून गेला, जे ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. अक्षय आणि कतरिना यांनी ‘सिंग इज किंग’, ‘नमस्ते लंडन’, ‘हमको दिवाना कर गए’, ‘सूर्यवंशम’ यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलंय.

कतरिनाने निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने ‘तीस मार खाँ’ या चित्रपटातील ‘शीला की जवानी’ या गाण्याच्या शूटिंगदरम्यानचा एक किस्सा सांगितला होता. या शूटिंगदरम्यान कतरिनाला अक्षयच्या हातावर राखी बांधायची होती. मात्र अक्षयने तिला साफ नकार दिला होता. याविषयी तिने सांगितलं, “मला अक्षयला राखी बांधायची होती. मी त्याचा खूप आदर करते आणि त्याला खूप मानते. त्यामुळे त्यात मला काही चुकीचं वाटलं नाही. मी त्याला विचारलं की, मी तुला राखी बांधू शकते का? त्यावर अक्षय मला म्हणाला, कतरिना, काय? तुला कानाखाली हवंय का?”

हे सुद्धा वाचा

याच मुलाखतीत कतरिनाने अर्जुन कपूरसोबतचा मजेशीर किस्सा सांगितला. “अक्षयने मला नकार दिल्यानंतर मी खूप नाराज झाले होते. मी एका पार्टीला गेली होती आणि तेव्हाच माझ्यासमोर अर्जुन कपूर आला होता. त्याचा स्वभाव खूप प्रेमळ आहे. मी अखेर त्याला राखी बांधायचं ठरवलं होतं. मी फक्त अर्जुनला इतकंच म्हटलं की, अर्जुन तू माझा मानलेला भाऊ बनशील का? मी तुला राखी बांधू शकते का? हे ऐकताच तो तिथून बाहेर पळाला. दुसऱ्या दिवशी जेव्हा तो माझ्यासमोर आला, तेव्हासुद्धा त्याने पळ काढला होता.”

कतरिनाने 9 डिसेंबर 2021 रोजी अभिनेता विकी कौशलशी लग्नगाठ बांधली. राजस्थानमध्ये हा लग्नसोहळा पार पडला होता. विकी कौशलशी लग्न करण्यापूर्वी कतरिनाचं नाव अभिनेता सलमान खान आणि रणबीर कपूर यांच्याशी जोडलं गेलं होतं. तर कतरिनाशी लग्न करण्यापूर्वी विकी हा अभिनेत्री हरलीन सेठीला डेट करत होता.