वादानंतर रणवीर अलाहाबादियाचं नवीन पॉडकास्टसह दमदार कमबॅक; प्रसिद्ध बौद्ध भिक्षूंसोबत पहिला संवाद

| Updated on: Apr 01, 2025 | 5:56 PM

युट्यूबर रणवीर अलाहाबादियाने पुन्हा नवीन सुरुवात करत एका नवीन पॉडकास्टसह त्याने दमदार कमबॅक केला आहे. या नवीन भागात त्याने पहिलाच संवाद साधला आहे तो एका लोकप्रिय आणि प्रसिद्ध बौद्ध भिक्षूंसोबत.

वादानंतर रणवीर अलाहाबादियाचं नवीन पॉडकास्टसह दमदार कमबॅक; प्रसिद्ध बौद्ध भिक्षूंसोबत पहिला संवाद
Ranveer Allahbadia Podcast Comeback, Buddhist Monk Interview After Controversy
Image Credit source: instagram
Follow us on

प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर रणवीर अलाहाबादिया, ज्याला बीअर बायसेप्स म्हणूनही ओळखले जाते. ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमध्ये त्याने केलेल्या कमेंटमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. पोलीस चौकशीपासून ते कोर्टकेसपर्यंत सर्वकाही त्याच्यासोबत घडलं. या वादानंतर रणवीरला प्रचंड ट्रोलिंगचाही सामना करावा लागला. त्याने माफी मागितल्यानंतरही त्याच्यावरील लोकांचा संताप कमी झालेली दिसत नव्हता. त्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते.

रणवीरचे नव्या पॉडकास्टसह उत्साहात कमबॅक 

यासोबतच, रणवीरला त्याचा प्रसिद्ध पॉडकास्ट कार्यक्रमही काही काळापुरता बंद करावा लागला होता.त्यामुळे रणवीरचा लोकप्रिय असलेला पॉडकास्ट पुन्हा सुरु होईल का? असा प्रश्न नक्कीच लोकांच्या मनात होता. मात्र आता काही काळ विश्रांती घेतल्यानंतर, रणवीरने पुन्हा त्याच्या पॉडकास्टसह उत्साहात कमबॅक केलं आहे. त्याने त्याच्या चॅनेलवर एक नवीन भाग लाँच केला आहे. ज्यामध्ये त्याने एका लोकप्रिय बौद्ध भिक्षूंना पाहुणे बोलावल्याचं पाहायला मिळत आहे.

बौद्ध भिक्षू आणि आध्यात्मिक नेते पालगा रिनपोछे यांच्याशी संवाद साधला

रणवीरने त्याच्या पॉडकास्ट शो ‘द रणवीर शो’ मध्ये त्याच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या अध्यायाचा पहिला भाग शेअर केला, ज्यामध्ये रणवीरने बौद्ध भिक्षू आणि आध्यात्मिक नेते पालगा रिनपोछे यांच्याशी संवाद साधला. पॉडकास्ट कार्यक्रमात, दोघांनी वाद, भूतकाळातील कर्म आणि सद्गुण यावर चर्चा केली, रिनपोछे यांनी आयुष्यभर पश्चात्ताप करण्यापेक्षा तुमच्या कृती स्वीकारणे आणि पुढे जाणे किती महत्त्वाचे आहे हे स्पष्ट केले.

हा व्हिडिओ ‘इंडियाज गॉट लेटेंट’ वादानंतर शूट करण्यात आला

ते म्हणाला की पश्चात्ताप लोकांना फक्त कटु बनवतो. दरम्यान, रणवीरने खुलासा केला की वादानंतर अनेकांनी त्याला काही वर्षांसाठी ब्रेक घेण्यास सांगितले, परंतु रिनपोछे यांनी त्याविरुद्ध सल्ला दिला आणि सांगितले की दीर्घ ब्रेक घेतल्याने त्याच्या चॅनेलला काही फायदा होणार नाही. रणवीरने कार्यक्रमादरम्यान असेही सांगितले की, हा व्हिडिओ ‘इंडियाज गॉट लेटेंट’ वादानंतर शूट करण्यात आला आहे.


चाहत्यांनी देखील त्याचे प्रेमाणे स्वागत केले 

रणवीरचा एपिसोड शेअर होताच चाहत्यांनी देखील त्याचे प्रेमाणे स्वागत केले आहे आणि त्याच्यावर पुन्हा प्रेमाचा वर्षाव केला आहे. तसेच त्याच्या यशासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत आणि त्याच्या दुसऱ्या अध्यायाबद्दल त्याचे कौतुकही केले. एका युजरने लिहिले, ‘ ठीक आहे त्याला माफ करा, सगळेच चुका करतात, तुझ्या मनात रावणही आहे, पण त्याने तुला त्याच्यासमोर सांगितले की त्याला सोडून दे नाहीतर त्याला तुझा वापर करू दे’.

दुसऱ्या एका वापरकर्त्याने लिहिले, ‘परिस्थिती एखाद्याला खूप बदलवू शकते’, तर दुसऱ्या एका वापरकर्त्याने लिहिले, ‘रणवीर एका बौद्ध भिक्षूच्या प्रभावाखाली शांती मिळवणाऱ्या एखाद्या निरागस मुलासारखा दिसतोय.’ तर, एका चाहत्याने तर म्हटले, ‘हे सर्व आवश्यक होते, हा एका मुलापासून पुरूषापर्यंतचा प्रवास होता, स्वागत आहे.’