Karisma Kapoor | भर पत्रकार परिषदेत जया बच्चन यांनी करिश्माला म्हटलं होतं ‘माझी होणारी सून’; पहा व्हिडीओ

| Updated on: Jun 26, 2023 | 11:11 AM

या घटनेच्या बऱ्याच वर्षांनंतर दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी एका मुलाखतीत अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर यांच्या तुटलेल्या नात्याविषयी खुलासा केला होता. अभिषेक आणि करिश्माने 2000 मध्ये जवळपास पाच वर्षे एकमेकांना डेट केलं होतं.

Karisma Kapoor | भर पत्रकार परिषदेत जया बच्चन यांनी करिश्माला म्हटलं होतं माझी होणारी सून; पहा व्हिडीओ
Jaya Bachchan and Karisma Kapoor
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई : एकेकाळी बॉलिवूड इंडस्ट्रीत अभिनेता अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर यांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा होत्या. इतकंच नव्हे तर या दोघांनी साखरपुडासुद्धा केला होता, असं म्हटलं जातं. मात्र लग्नाआधीच या दोघांचं नातं तुटलं. कपूर आणि बच्चन कुटुंबीयांमध्ये खास नातेसंबंध सुरू होण्याआधीच सर्वकाही संपुष्टात आलं. जया बच्चन यांनी एका पत्रकार परिषदेत करिश्माचा उल्लेख ‘माझी होणारी सून’ असा केला होता. माध्यमांसमोर त्यांनी करिश्मा आणि अभिषेकचं लग्न जाहीर केलं होतं. यावेळी मंचावर संपूर्ण बच्चन कुटुंब उपस्थित होतं. या पत्रकार परिषदेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बच्चन कुटुंबीयांची पत्रकार परिषद

या व्हिडीओमध्ये पहायला मिळतंय की संपूर्ण बच्चन कुटुंब मंचावर बसलं आहे. अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, मुलगी श्वेता नंदा पत्रकार परिषदेच उपस्थित आहेत आणि मंचावर जया बच्चन बोलत आहेत. “बच्चन आणि नंदा कुटुंबात आम्ही आणखी एका कुटुंबाचं स्वागत करत आहोत आणि ते म्हणजे कपूर कुटुंब. रणधीर – बबिता कपूर आणि माझी होणारी सून करिश्मा कपूर. वडिलांच्या 60 व्या वाढदिवशी अभिषेकने आम्हाला दिलेली ही भेट आहे,” अशी घोषणा करत त्या करिश्माला मंचावर बोलावतात. त्याचवेळी करिश्मासुद्धा मंचावर येऊन जया बच्चन यांना मिठी मारते. त्यानंतर अभिषेक आणि अमिताभ बच्चनसुद्धा फोटोसाठी उभे राहतात.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

साखरपुडा का मोडला?

या घटनेच्या बऱ्याच वर्षांनंतर दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी एका मुलाखतीत अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर यांच्या तुटलेल्या नात्याविषयी खुलासा केला होता. अभिषेक आणि करिश्माने 2000 मध्ये जवळपास पाच वर्षे एकमेकांना डेट केलं होतं. लग्नाच्या निर्णयापर्यंत पोहोचलेल्या या दोघांचा साखरपुडासुद्धा झाला होता. मात्र त्यानंतर त्याचं नातं तुटलं. सुनील दर्शन यांनी 2000 मध्ये ‘हां मैने भी प्यार किया’ या चित्रपटासाठी दोघांसोबत काम केलं होतं. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सुनील यांना अभिषेक-करिश्मामधली जवळीक स्पष्ट दिसू लागली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला आणि त्याचसोबत अभिषेक-करिश्माचं नातंसुद्धा संपुष्टात आलं.

बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत सुनील दर्शन म्हणाले होते, “अभिषेक-करिश्माच्या नात्याची अफवा नव्हती, ते सत्य होतं. ते दोघं लग्न करणार होते. मी स्वत: त्यांच्या साखरपुड्याला उपस्थित होतो.” या दोघांचं नातं फार काळ टिकणार नाही, याची चुणूक सुनील दर्शन यांना चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच लागली होती.

“अभिषेक आणि करिश्मा हे सेटवर नेहमीच एकमेकांशी भांडायचे. या दोघांची जोडी ‘मेड फॉर इच अदर’ अशी नव्हती. सतत त्यांच्यात भांडणं व्हायची. कदाचित काही लोकांचं नातं असंच असतं. मला नेहमीच प्रश्न पडायचा की खरंच हे दोघं एकमेकांसाठी बनले आहेत का? अभिषेक आणि करिश्मा दोघं स्वभावाने चांगले आहेत. पण दोघांच्या नशिबात एकत्र राहणं नव्हतं,” असं ते म्हणाले होते.