बांगलादेशात विद्यार्थ्यांचे सुरु झाले आंदोलन थांबण्यास तयार नाही. या आंदोलनामुळे शेख हसीन यांना बांगलादेश सोडावा लागला. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे लक्ष आता अल्पसंख्याक हिंदू ठरत आहे. बांगलादेशात हिंदूंवर हल्ले होत आहेत. अत्याचाराचा सामना हिंदूंना करावा लागत आहे. आता बांगलादेशात असणाऱ्या हिंदू शिक्षक आंदोलनाचे केंद्र बिंदू ठरत आहेत. त्यांच्याकडून बळजबरीने राजीनामे लिहून घेतले जात आहे. फक्त दोन शब्द ‘I resign…’, लिहून राजीनामे घेतले गेले आहे. 5 ऑगस्टपासून आतापर्यंत 50 हिंदू शिक्षकांचे राजीनामे घेतल्याचे वृत्त ‘आज तक’ने दिले आहे. या शिक्षकांची यादीही दिली गेली आहे.
बांगलादेशात छात्र एक्य परिषद आहे. या संघटनेत हिंदू, बौद्ध अन् इसाई लोक आहे. त्यानंतर शनिवारी पत्रकार परिषद घेऊन हिंदू शिक्षकांकडून राजीनामे लिहून घेतले जात असल्याचा विषय पुढे आणला. बकरगंज कॉलेजमधील प्राचार्य शुक्ला रॉय यांचा राजीनामा लिहून घेतानाचा फोटो समोर आला आहे. एका साध्या कागदावर “I resign…” इतके लिहून त्यांची सही घेतली गेली आहे. काझी नजरुल विद्यापीठाचे प्रोफेसर संजय कुमार मुखर्जी यांनी राजीनामे घेतले जात असल्याच्या वृत्ताला दुजारा देत सांगितले की, राजीनामा देण्यासाठी माझ्यावर सक्ती करण्यात आली. बांगलादेशात आम्ही खूपच असुरक्षित आहे.
ढाका विद्यापीठातील गणित विभागाचे प्राध्यापक डॉ. चंद्रनाथ पोद्दार यांनाही विद्यार्थ्यांनी राजीनामा देण्यास भाग पाडले. ज्या शिक्षकांनी भीतीपोटी कॅम्पसमध्ये न येण्याचा निर्णय घेतला होता, त्यांच्या घरी जावून जिहादी गटांनी राजीनामा देण्यास भाग पाडले आहे.
बांगलादेशातील निर्वासित लेखिका तस्लिमा नसरीन यांनी X वर लिहिले की, ‘बांगलादेशातील परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे. शिक्षकांना राजीनामा देण्यास भाग पाडले जात आहे. पत्रकार, मंत्री आणि माजी सरकारी अधिकारी मारले जात आहेत. त्यांना तुरुंगात टाकले जात आहेत. या सर्व प्रकरणात नोबेल पुरस्कार विजेता मोहम्मद यूनुस शांत आहेत.